टीम इंडिया काल वाईट पराभवाचा सामना करावा लागला. (T20) सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया हा वर्ल्ड कप खेळत आहे. सुपर-8 राऊंडचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. या मॅचमध्ये भारताचा 76 धावांनी पराभव झाला. टी20 वर्ल्ड कपमध्ये रन्सच्या हिशोबाने भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे. या पराभवाने टीम इंडियाच्या सलग विजयाच्या सिलसिल्याला ब्रेक लावला. यानंतर टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग अधिक खडतर झाला आहे. उर्वरित दोन सामने जिंकावेच लागतील तेव्हा मीफायनलमध्ये प्रवेश करता येईल. पण त्यानेही वाट धुसरच दिसतेय.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 22 फेब्रुवारीला भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये सामना झाला. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही बाबतीत टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेसमोर फार काही चाललं नाही. गोलंदाजांनी टीमला चांगली सुरुवात दिली तसचं नंतर मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या धावगतीला लगाम घातली. दक्षिण आफ्रिकेने 187 धावा केल्या. वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासून टीम इंडियाच्या बॅटिंगमध्ये पाहिजे तसा दम दिसलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तर फलंदाजीची पोल-खोल झाली. टीम इंडियाचा डाव 111 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेने एका मोठ्या विजयाची नोंद केली.
T-20 World Cup: दक्षिण आफ्रिकेपुढं भारताच्या वाट्याला पराभव, सेमीफायनलची वाट बिकट
या एका मॅचच्या निकालाचा सेमीफायनल प्रवेशावर परिणाम होणार आहे. टीम इंडिया एक पराभवासह करो या मरोच्या स्थितीत आहे. सुपर-8 राऊंडमध्ये प्रत्येक टीमला 3-3 सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाने आपला पहिला सामना गमावलाय. आता सेमीफायनलच तिकिट कसं मिळणार?. असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. पहिलं म्हणजे टीम इंडियाला दोन्ही सामने जिंकावेच लागतील. टीम इंडियाचा पुढचा सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वे विरुद्ध आणि शेवटचा सामना 1 फेब्रुवारीला वेस्ट इंडिज विरुद्ध आहे. टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे 4 पॉइंट्स होतील.
दुसऱ्या टीम्सनी किती सामने गमावणं आवश्यक?
पण हे सर्व इतकं सोपं नाहीय.भारत आता अशा स्थितीत आहे की, फक्त जिंकून भागणार नाहीय, तर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या तीन टीम पैकी कुठल्या दोन टीम्सनी 2-2 सामने गमावले पाहिजेत. अशावेळी टीम इंडियाचे 4 पॉइंट होतील. अन्य एका टीमचे 4 किंवा 6 पॉइंट होतील. अशा स्थितीत टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग सुकर होईल.
दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट किती?
भारताशिवाय अन्य दोन टीम्सचे 4-4 पॉइंट झाले तर सेमीफायनल प्रवेशासाठी दुसऱ्या मार्गाने निर्णय होईल. ICC च्या नियमानुसार, पॉइंट्स बरोबरीत असतील तर जास्त मॅच जिंकणारी टीम पुढे जाईल. तिन्ही टीम्सचे 2-2 पॉइंट झाले तर पेच फसेल. नेट रनरेटनेही टीम इंडियाची अडचण वाढवली आहे. 76 धावांनी पराभव झाल्यामुळे भारतीय टीमचा नेट रनरेट -3.800 झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट 3.800 आहे. त्यामुळे टीम इंडियाला पुढचे दोन सामने फक्त जिंकायचेच नाहीयत, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल.
