Download App

Virat Kohli : दोन पेगनंतर रात्रभर डान्स करायचो, पण ‘लेटनाईट पार्टी’ बंद केल्या, अनुष्काने सांगितले कारण

  • Written By: Last Updated:

आधी मी २-३ पेगनंतर रात्रभर डान्स करायचो. पण आता दारू पिणे सोडले आहे. एका मुलाखतीमध्ये विराट आणि अनुष्का यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही आठवणी सांगितल्या आहेत.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मागील आठवड्यात एका अवॉर्ड सोहळ्यात सहभागी झाले होते.यावेळी मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की पूर्वीप्रमाणे ते आता लेट नाईट पार्ट्यांना जात नाहीत. पूर्वी ते रात्री तीनपर्यंत जागे असायचे पण आता तसे होत नाही. आजकाल ते रात्री ९.३० पर्यंत झोपी जातात.

यावेळी बोलताना विराट म्हणाला की आधी मी २-३ पेगनंतर रात्रभर डान्स करायचो. पण आता दारू पिणे सोडले आहे. तर अनुष्का म्हणाली की वामिकाच्या जन्मानंतर लेट नाईट पार्टी आता शक्य होत नाही

राघव चड्डा आणि परिणीती चोप्राचा साखरपुडा झाला? ‘आप’ खासदाराच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण

याच मुलाखतीमध्ये बोलताना अनुष्का म्हणाली की, ‘आता आम्ही रात्री ९.३० च्या आधी आमच्या बेडवर असतो. पूर्वी पहाटे ३ वाजेपर्यंत जागायचो, रात्री उशिपर्यंत पार्टी करायचो पण वामिकाच्या जन्मानंतर ते शक्य होत नाही. मुलाच्या जन्मानंतर आपण खूप सामाजिक राहू शकत नाही.

अनुष्का पुढे म्हणाली की पण आम्ही यात आनंदी आहोत, कारण आम्हा दोघांना फारसे सामाजिक राहणे आवडत नाही. आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आवडतात, जसे की घरी वेळ घालवणे. आम्हाला एकमेकांसोबत घालवायला फारसा वेळ मिळत नाही, त्यामुळे आम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तो कुटुंबासोबत घालवायला आवडतो.

रात्रभर डान्स करायचो

या मुलाखतीमध्ये विराट म्हणाला की आता मी ड्रिंक करत नाही, पण याआधीही मी जेव्हा पार्टीला जायचो तेव्हा दोन-तीन ड्रिंक्सवर थांबत नसे. रात्रभर नाचायचो, नाचताना कशाचीच पर्वा करत नव्हतो. पण हे सर्व भूतकाळातील आहे. आता असे होत नाही.

सावरकर वाद! ठाकरेंची बाजू घेत शरद पवार यांनी राहुल गांधींना सुनावलं

Tags

follow us