Bachchu Kadu Protest Update: बच्चू कडू म्हणजे एक आक्रमक आणि थेट बोलणारा नेता. सरकारच्या चुकांवर बोट ठेवणारा, कुणालाही न घाबरणारा कुणाचंही न ऐकणारा, बेधडक भाष्य करणारा नेता. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, अपंगांची गरज असो किंवा ग्रामविकासाचा मुद्दा — बच्चू कडू नेहमीच आवाज उठवत आले. पण हेच बच्चू कडू २०२४ च्या निवडणुकीत जोरदार पराभूत झाले आणि त्यांच्या किंगमेकर हेण्याच्या स्वप्नांची धूळधाण झाली. हा पराभव कडूंना सक्रिय राजकारणातून बाजूला नेणारा ठरला आणि मग आता त्यावर बच्चू कडू यांनी उपोषणाच्या रूपानं उतारा शोधला की काय— अशी चर्चा राज्यात रंगली आहे.
पुण्यात अजितदादांच्या कार्यक्रमात गोंधळ; भर सभेत मंचासमोर येत कडूंच्या समर्थकांनी ‘प्रहार’ करत घेरलं
आता प्रश्न असा आहे की, बच्चू कडूंचं हे उपोषण खरंच जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी आहे का? की आपलं हरवलेलं राजकीय वजन परत मिळवण्यासाठी? त्यांच्या मागण्या महत्त्वाच्या आहेतच — जसे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमजुरांचे हक्क, दिव्यांगांचं जीवनमान, विधवा महिलांचे प्रश्न, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं भविष्य, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, हे सगळं महत्वाचं आहेच. पण हेच प्रश्न बच्चू कडूं मंत्री असतानाही सोडवू शकले असते. शालेय शिक्षण, जलसंपदा, कामगार, सामाजिक न्याय अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती…
सत्तेसाठी बच्चू कडू थेट गुवाहाटीपर्यंत गेले, शिंदे गटात सामील झाले, महायुतीचा भाग झाले. मंत्रिमंडळात सामीलही झाले. पण, तिथं निर्णय घेण्याची किंवा काम करण्याची संधी लाभली असतानाही हे प्रश्न त्यांनी तेव्हा का उचलले नाहीत? आता विरोधात गेल्यावर हे सगळे प्रश्न का आठवलेत? खरोखरच बच्चू कडू यांचं हे उपोषण आणि राजकीय समीकरण यांचा काही संबंध आहे का?
Ahmedabad plane crash मधील मृतांचा आकडा वाढला; मेडीकल कॉलेजमधील 34 जणांचा मृत्यू
टाइम्स ऑफ इंडिया चे वरिष्ठ पत्रकार राजकुमार सिंग म्हणाले — “राजकारणात उपोषण हे पावसासारखं असतं… जसं नदीला प्रवाहीत व्हायला पाऊस लागतो, तसंच राजकीय प्रवाहात राहण्यासाठी राजकारण्यांना उपोषण, आदोलनांची गरज भासते.” पण प्रश्न असा आहे — सत्ता हातात असताना या प्रश्नांवर काम का केलं नाही? तेव्हा या प्रश्नांची सोडवणूक का झाली नाही? आजही भाजप असो किंवा शिंदे गट — बच्चू कडूंच्या या उपोषणाकडे फारसं लक्ष देताना दिसत नाहीत. त्यांची मागणी सरकारकडून दुर्लक्षित होतेय का? की दोन्ही पक्ष बच्चू कडूंचं महत्त्व कमी करायचा डाव खेळतायत?
काँग्रेस, शरद पवार गट यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा या आंदोलनाला आहे. मग हे उपोषण म्हणजे खरंच जनहितासाठी आहे का? की नव्या राजकीय समीकरणांची चाचपणी?
एकंदरीत — बच्चू कडूंच्या मागण्या महत्त्वाच्या आहेत हे मान्यच… पण त्या मागे आपलं राजकीय अस्तित्व परत मिळवण्याचा प्रयत्न आहे का — हा प्रश्न तसाच अनुत्तरित आहे. येणाऱ्या काळात या प्रश्नांची उत्तर नक्कीच मिळतील.