Download App

Amitabh Bachchan: अ‍ॅक्शन सीनसाठी 30 फूटांवरुन अभिनेत्याने मारली होती उडी; म्हणाले…

Amitabh Bachchan Share Action Sequence Pics: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे बॉलिवूडचे (Bollywood) बादशाह आहेत. पाच दशकांपासून ते इंडस्ट्रीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. एक काळ असा होता जेव्हा बिग बी हे अँग्री यंग मॅन म्हणूनही ओळखले जायचे. तो त्याच्या चित्रपटांमध्ये खूप ॲक्शन सीन्स करत असे, जे पाहून प्रेक्षक दंग होत असत. अनेक चित्रपटांमध्ये अमिता बच्चन यांनी कोणत्याही सुरक्षेशिवाय भयानक स्टंट सीन्स केले होते. त्या काळात ॲक्शन सीक्वेन्स कसे शूट केले गेले हे दाखवणारे एक थ्रोबॅक फोटो स्वतः अभिनेत्याने शेअर केले आहे.


ॲक्शन सीन शूट करण्यासाठी अमिताभ जीव धोक्यात घालत असत

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ॲक्शन स्टंट करतानाचा एक जुना फोटो शेअर केला. तसेच सांगितले की, त्या काळात जीव धोक्यात घालून ॲक्शन सीन शूट केले जात होते. फोटोसोबत अभिनेत्याने लिहिले आहे की, “ॲक्शन सीक्वेन्ससाठी 30 फूट उंच खडकावरून उडी… ना हार्नेस, ना फेस रिप्लेसमेंट, ना VFX… आणि ना ही लँडिंग… जर तुम्ही नशीबवान असाल तर…काय दिवस होते ते…”. अशी पोस्ट अभिनेत्याने यावेळी केली आहे.

चाहत्यांनी अमिताभ यांना खरा हिरो म्हटले

हा जुना अनुभव शेअर केल्यानंतर लगेचच, त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि एक स्टार म्हणून त्याच्या समर्पणाची कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले, “अमितजी, तुम्ही सर्वोत्कृष्ट होता आणि नेहमी राहाल,” तर दुसऱ्याने कमेंट केली, “म्हणूनच आम्ही तुम्हाला खरा ॲक्शन हिरो मानतो. सलाम.” इतर अनेक वापरकर्त्यांनी देखील अभिनेत्याचे खूप तोंडभरून कौतुक केले आहे.

Shaitan: काळी जादू दाखवायला आर. माधवन तुमच्या घरी येतोय; कधी आणि कुठे पाहाल सिनेमा?

बिग बी त्यांच्या पात्रांमध्ये जीव ओततात

अमिताभ बच्चन त्यांच्या शिस्त आणि प्रत्येक पात्रात प्राण फुंकण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी साकारलेल्या सर्वच भूमिका संस्मरणीय ठरतात. असेच एक पात्र म्हणजे करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ मधील यश रायचंद. निर्माता-दिग्दर्शक निखिल अडवाणी ‘K3G’ चे सहयोगी दिग्दर्शक होते आणि त्यांनी एकदा उघड केले की बिग बींनी एका दृश्यासाठी त्यांच्या कुटुंबाशी बोलणे देखील बंद केले.

रेडिफला दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान निखिल अडवाणीने सांगितले होते की, चित्रपटात एक सीन आहे. ज्यामध्ये अमित जीचे पात्र शाहरुख खानला घराबाहेर फेकून देते जेव्हा तो काजोलशी लग्न करतो. बिग बींना फक्त एकच डायलॉग बोलायचा होता, “आज तू सिद्ध कर दिया है कि तू मेरा खून नहीं है.” पण त्या ‘स्ट्रीक्ट’ मोडमध्ये येण्यासाठी बच्चन यांनी त्यांच्या घरी सर्वांशी बोलणे बंद केले होते.

अमिताभ बच्चन वर्क फ्रंट

बिग बींच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच प्रभास आणि दीपिका पदुकोण स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. बिग बींचा मागचा चित्रपट टायगर श्रॉफ आणि क्रिती सेननसोबत ‘गणपत’ होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला होता.

follow us

वेब स्टोरीज