Download App

राज्य सरकारचा मोठा निर्णय, अतिवृष्टी मदत व बचाव कार्यासाठी ‘या’ जिल्ह्यांमध्ये NDRF, SDRF पथके तैनात

Maharashtra Rain Alert : राज्यात सध्या सुरू अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी मुंबई येथे दोन रायगड

Maharashtra Rain Alert : राज्यात सध्या सुरू अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी मुंबई येथे दोन रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी एक एनडीआरएफचे (NDRF) पथक पोहोचले आहे. तर गडचिरोली आणि नांदेड येथे एसडीआरएफचे (SDRF) प्रत्येकी एक पथक पोहोचले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके (Satish Kumar Khadke) यांनी दिली.

93 लाख 33 हजार एसएमएस

आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांनी दिलेल्या माहितीनुसार सचेत ॲपमार्फत आज 28 मे 2025 रोजी 17 अलर्ट पाठविण्यात आले आहेत. हे अलर्ट मेसेज 93 लाख 33 हजार नागरिकांना आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी पाठविण्यात आले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील 39 नागरिकांचा बचाव

अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील अकोळणेर, खडकी, वाळकी, सोनेवाडी रोड, शिरढोण येथे अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी पुरात अडकलेल्या 39 नागरिकांना लष्कर, अग्निशमन दल आणि पालिका प्रशासनाच्या पथकांमार्फत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

खडके यांनी सांगितले, भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी पुढील 24 तासांकरीता ऑरेंज अलर्ट दिला आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील बुलढाणा (47.9 मिमि), अकोला (46 मिमि), जालना (44.6 मिमि), यवतमाळ (39.7 मिमि) आणि रत्नागिरी (35.7 मिमि) या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला असल्याचेही संचालक खडके यांनी सांगितले.

इस्रायली सैन्याची मोठी कारवाई, हमासचा गाझा प्रमुख मोहम्मद सिनवार ठार, PM नेतन्याहू यांची घोषणा

राज्यात भिंत कोसळणे, झाड पडणे, वीज कोसळणे, पाण्यात बुडणे, आगीत जळणे, पुराचे पाणी या घटनांमुळे 27 ते 28 मे 2025 (दु. 4.00 वाजेपर्यंत) 14 व्यक्ती आणि 20 प्राणी मृत झाली आहेत. तर 16 व्यक्ती आणि 1 प्राणी जखमी झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

follow us