Download App

Video : भाजप नेत्याने इंद्रायणी पूल दुर्घटनेची जबाबदारी झटकली; म्हणाले, सूचना दिल्या होत्या, पण…

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर कुंडमळ्यात पूल कोसळून नुकतीच मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत

  • Written By: Last Updated:

Ravindra Chavan on Indrayani Bridge Collapse : विधानसभा निवडणुकीपूर्वी इंद्रायणी पुलाची (Indrayani Bridge Collapse)दुरुस्थी करण्याच्या सूचना मी दिल्या होत्या. त्यामध्ये का? आणि कुणी दिरंगाई केली हे तपासून (Bridge) कारवाई करण्यात येईल. तसंच, याबाबत मी शिवेंद्रराजे भोसले यांच्याशीही बोललो आहे अशी माहिती भाजप नेते रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर कुंडमळ्यात पूल कोसळून नुकतीच मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल 20 ते 25 जण वाहून गेले. तर समोर आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे २५ जण वाहून गेले. या घटनेनंतर या पुलाच्या दुरुस्थीचा मुद्दा समोर आला होता. त्यावर बोलताना रंविद्र चव्हाण यांनी आज भाष्य केलं आहे.

मावळमधील इंद्रायणीवरील पूल कोसळला; वाहून गेलेल्यांपैकी 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त

संजय राऊत विश्वप्रवक्ते आहेत. ते रोज बोलतच असतात, त्यांना रोज उत्तर दिलं तरी ते बोलतच राहतात, असे चव्हाण म्हणाले. पुलांच्या दिरंगाईमुळे निष्पाप लोक गेली. नव्या पुलाला दिरंगाई का केली? याची चौकशी होईल. हेतूपरस्पर कोणी दिरंगाई केली असेल तर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.

पूल दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, जखमी लोक लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो. मी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करत असताना जे विषय माझ्याकडे यायचे त्यावर मी तात्काळ कारवाई करून विषय मार्गी लावायचो. स्थानिक भाजप नेते रविंद्र भेगडे यांनी माझ्याकडे पुलाबाबत निवेदन देताच मी विभागाला सांगून योग्य ती कारवाईचे निर्देश दिले आणि ८ कोटींच्या निधीबाबत कारवाई केली.

बजेटमध्ये होणारी तरतूद हजारांमध्ये होते. या तरतुदीपेक्षा एक हजार पट रक्कम अशी ती तरतूद असते. हे समजून घेण्यासाठी आमचे नेते देवेंद्रजी यांनी अर्थसंकल्प कसा वाचावा? यासाठी पुस्तक लिहिलंय. पुलाच्या कामाला मंजुरी दिलेली आहे, निधी प्रस्तावित आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि खात्याच्या सचिवांना फोन करून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. कामाला दिरंगाई का झाली? दोषी कोण? याची चौकशी केली जात आहे, असे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

 

follow us

संबंधित बातम्या