Kundmala Bridge Collapse : इतकी वर्ष सत्तेत… नव्याने पूल का नाही झाला? राज ठाकरेंनी फडणवीस सरकारला घेरलं

Kundmala Bridge Collapse : इतकी वर्ष सत्तेत… नव्याने पूल का नाही झाला? राज ठाकरेंनी फडणवीस सरकारला घेरलं

Raj Thackeray On Kundmala Bridge Collapse Rescue Operation Pune : मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ ( Kundmala Bridge Collapse) काल इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी (Indrayani river bridge) पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काहीजण मृत्युमुखी पडले. नक्की हानी किती झाली आहे? याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (Mns) भावपूर्ण श्रद्धांजली, असं मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मिडिया पोस्ट करत म्हटलं आहे.

सत्तेचा अनुभव नक्की कुठला?

हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली, हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता, तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला? प्रत्येक घटनेनंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक (Pune News) प्रतिक्रिया येते की, ‘बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे…’ पण मुळात हा प्रसंग का येतो ? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं, तर पावसाळ्याच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत? त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही ? बरं प्रशासन करत नसेल, तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत? जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग?

Iran Israel Conflict : 72 तासांच्या युद्धात किती नुकसान? 2,300 किमीवरून हल्ला, इराणमध्ये 406 आणि इस्रायलमध्ये 16 जणांचा मृत्यू

सरकार जर निष्काळजीपणा…

पण लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल, तर आपणच सतर्क राहायला हवं.

Ashadhi Wari : यंदा पालखीवर ‘एआय’चं लक्ष, बससेवा आणि रेल्वेचं काय नियोजन? वाचा एका क्लिकवर

आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे, तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, हे पाहावं असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube