Download App

नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत कॉंग्रेसला पडायचंच नाही

Nana Patole On CM Post : राज्यात (Maharashtra) सध्या आगामी मुख्यमंत्रिपदाची (CM Post)स्पर्धा सरु आहे. त्यात काँग्रेसला पडायचे नाही. जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी (Congress)महत्वाचे आहेत. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन लढत आहोत. मुख्यमंत्री कोणाला करायचे हे जनताच ठरवेल. काँग्रेसकडे प्लॅन बी, प्लॅन सी, सगळे प्लॅन तयार आहेत. आम्ही ते प्लॅन योग्यवेळी सांगणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole)परखडपणे सांगितले आहे.

Akole Long March : लोणीकडे निघालेला लाँग मार्च स्थगित; मोर्चेकऱ्यांना विखेंनी दिले आश्वासन

मुंबईमध्ये राज्याच्या राजकारणावर (Politics)पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर नाना पटोलेंनी सडेतोड उत्तरं दिली आहेत. पटोले म्हणाले की, सध्या राज्यातील जनता अनेक समस्यांना तोंड देत आहे. शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे आतोनात नुकसान झाले आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

बारसू प्रकल्प (Barsu Project)जबरदस्तीने लादला जात आहे. खारघरमध्ये सरकारी कार्यक्रमात हत्याकांड झाले. त्यावर सरकार लपवाछपवी करत आहे. आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. त्यावर आमचे लक्ष आहे. बाकीच्या चर्चांमध्ये आम्हाला रस नाही, असेही नाना पटोले म्हणाले. यावेळी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

यावेळी नाना पटोलेंनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार निशाणा साधला आहे. ते यावेळी म्हणाले की, केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपने मागील 9 वर्षात जनतेसाठी काहीही केलेलं नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहेत. देशाची संपत्ती विकून देश चालवणारा पंतप्रधान देशाने पहिल्यांदाच पाहिला आहे. नरेंद्र मोदींचा खरा चेहरा देशातील जनतेला आता कळाला असून नरेंद्र मोदी हे, ना हिंदूंचे आहेत, ना मुस्लिमांचे, ना देशाचे, अशी घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Tags

follow us