Download App

“आता राज ठाकरेंकडे युतीची भीक मागताय तेव्हा तर..”, माजी मंत्र्याची उद्धव ठाकरेंवर आगपाखड

उद्धव ठाकरे हातात कटोरा घेऊन राज ठाकरेंकडे युतीची भीक मागताहेत, असे रामदास कदम म्हणाले आहेत.

Ramdas Kadam Criticized Uddhav Thackeray : मुंबई महापालिका जवळ आलेल्या असतानाच मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सुद्धा या संभाव्य युतीबाबत सकारात्मक संकेत दिले होते. ‘राज्याच्या मनात जे आहे तेच मी करणार’ असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर माजी मंत्री रामदास कदम यांनी (Ramdas Kadam) घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे हातात कटोरा घेऊन राज ठाकरेंकडे युतीची भीक मागताहेत, असे कदम म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

1960 साली ज्या मराठी माणसाने बलिदान देऊन रक्त सांडून मुंबई आपल्याला मिळवून दिली, त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही आमच्यापासून तुटू देणार नाही. मुंबईचं महत्व कमी होऊ देणार नाही. म्हणून आम्ही उभे राहिलो तरी मुंबई वाचेल. जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच करायला तयार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी काल पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात सांगितले होते.

‘पेंग्विनची उंची अन् कोंबडीचा आवाज’, ठाकरेंच्या टिकेवर नितेश राणे भडकले म्हणाले, “त्यांनी स्वतःचा मुलगा..”

काय म्हणाले रामदास कदम ?

उद्धव ठाकरे आता हातात भिकेचा कटोरा घेऊन राज ठाकरेंकडे युतीची भीक मागत आहेत. बाबा मला युतीची भीक दे असं म्हणताहेत. त्यांचं राज ठाकरेंवर भाऊ म्हणून प्रेम नाही तर महापालिकेसाठीच सगळं केलं जात आहे. एकेकाळी मी आणि बाळा नांदगावकर शिवसेनेत होतो. तेव्हा हेच उद्धव ठाकरे म्हणाले होते की एक म्यान में दो तलवारे नहीं होती. तेव्हा राज ठाकरेंना सोबत घेतलं नाही आणि आता त्यांच्याकडे भीक मागत आहेत.

त्यावेळी राज ठाकरे फक्त पुणे आणि नाशिक मागत होते. पण उद्धव ठाकरेंनी तेही दिले नाहीत. आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती करा असे म्हणत आहेत. आता जर या दोघांची युती झाली तर यात राज ठाकरेंचंच नुकसान होणार आहे. मराठी माणसासाठी एकत्र यायचं असं सांगितलं जातंय पण खरंतर मराठी माणसाला तुम्हीच (उद्धव ठाकरे) मुंबईत बाहेर काढलं. तुम्हीच मुंबईतून मराठी माणूस संपवला असा संताप कदम यांनी व्यक्त केला.

नितेश राणेंचंही तिखट प्रत्युत्तर

ज्यांना आम्ही जिहादी हृदयसम्राट म्हणतो त्यांच्याकडून त्यांच्याकडून हिंदू समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शापच मिळणार. मी हिंदुत्वाचं काम करणारा एक कार्यकर्ता आहे. मला बोलणं म्हणजे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं काम तुम्हाला (उद्धव ठाकरे) खटकतंय ते पण बाळासाहेबांच्या मुलाला खटकतंय. ज्या बाळासाहेबांनी नेहमी हिंदुत्वाचा पुरस्कार केला त्यांच्या मुलाला कोण हिंदुत्वासाठी काम करतंय. हिंदू समाजासाठी उभं राहतंय हे त्यांना खटकणार. हा खरंतर बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे. उद्धव ठाकरेला हे कळलेलं नाही. ठाकरे ब्रँड संपला संपला म्हणून जे ओरड घालताहेत हिंदु्त्वाचा हात सोडला म्हणून ठाकरे ब्रँडला हे दिवस दिसले आहेत.

निवडणूक आयोग मोदी सरकारच्या हातचे बाहुले, 48 तासात नियम 93 बदलला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

follow us