Fruit Crop Insurance Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पीक विम्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने फळपीक विमा योजनेसाठी (Fruit Crop Insurance) मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान आधारित फळपीक विम्यासाठी अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेत शेतकरी 6 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी दिली.
या योजनेंतर्गत मृग बहार 2025 मध्ये द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू, मोसंबी या पिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी अर्ज करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, शेतकऱ्यांना अर्ज करण्यात येणाऱ्या अडचणी पाहता योजनेला मुदतवाढ मिळाली आहे. आता इच्छुक शेतकऱ्यांना 6 जुलैपर्यंत अर्ज करता येतील.
.. तर पीक विमा कंपन्या ब्लॅकलिस्ट, सरकारी यादीतूनही वगळणार; कृषिमंत्री कोकाटेंची घोषणा
मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांना अर्ज करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या www.pmfby.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेत अर्ज करताना काही महत्वाची कागदपत्रे शेतकऱ्यांकडे असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. फार्मर आयडी असेल तरच या योजनेत अर्ज करता येणार आहे. फार्मर आयडी नसेल तर शेतकऱ्यांनी वेबसाइटवरून आधी आयडी काढून घ्यावा. आयडी मिळवण्यासाठीची प्रक्रियाही सोपी आहे. त्यानुसार कार्यवाही करुन फार्मर आयडी काढून घ्यावा.
सर्वसमावेशक पीक विमा योजनेत (Crop Insurance Scheme) बदल करुन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्या पीक विमा कंपन्या दोषी सिद्ध होतील त्यांना काळ्या यादीत टाकून शासन यादीतून कायमस्वरुपी वगळण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली.
पीक कापणी प्रयोगांच्या आधारे शेतकऱ्यांना योग्य आणि निश्चित स्वरुपात नुकसानभरपाई मिळेल. आता जी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे त्यात पीक कापणी प्रयोगांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. 2016-17 ते 2023-24 या काळात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 43201.33 कोटी रुपये विमा हप्ता जमा झाला होता. यातून 32629.73 कोटी रुपये इतकी रक्कम नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांना देण्यात आली. उर्वरित 7173.14 कोटी रुपयांचा नफा विमा कंपन्यांना मिळाला होता, अशी माहिती कृषिमंत्री कोकाटे यांनी दिली.
पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस धो धो पाऊस, अलर्ट जारी