Download App

‘त्या’ दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut on Girish Mahajan : पुढच्या आठ दिवसाच त्यांच्याकडे कोणी राहणार नाही, उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे.

Sanjay Raut on Girish Mahajan : पुढच्या आठ दिवसाच त्यांच्याकडे कोणी राहणार नाही, उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशी टीका राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी नाशिकमध्ये (Nashik) माध्यमांशी बोलताना शिवसेना बाळासाहेब पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली होती. तर आता या टीकेला ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांन प्रत्युत्तर देत आमच्याकडे जेव्हा सत्ता येईल त्यादिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीष महाजन असेल अशी टीका केली आहे.  खासदार राऊत आज माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, गिरीश महाजन यांचा पक्ष मुळात जागेवर आहे का? भ्रष्ट, ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघाले आहेत. हातात पोलीस आहे, पैसे आहे. त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल भाजपने नेमले आहेत, त्यातले पक्ष फोडणारे एक दलाल म्हणजे गिरीश महाजन आहेत. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल, त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल असं माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले.

गिरीश महाजन सोडणार होते 

संजय राऊत यांनी यावेळी गिरीश महाजनबाबात मोठा खुलासा करत गिरीश महाजन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गिरीश महाजन पक्ष सोडण्याची तयारी करत होते असा खुलासा केला आहे. संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या चौकशी सुरु झाल्या होत्या तेव्हा ते पक्ष बदलायला तयार होते. तेव्हा त्यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भानगडींच्या चौकशी सुरु होत्या.

वर्धा, नागपूर, भंडारासह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

तेव्हा हेच निरोप पाठवत होते की, मी राजकारणातून बाहेर पडतो. मी शांत बसतो. हे डरपोक आणि गांX लोक आहेत. असं देखील खासदार संजय राऊत म्हणाले.

follow us