Dhairyasheel Mohite Exclusive on Letsupp Marathi : म्हाढा लोकसभा मतदारसंघातील लोकांनी मला खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं, त्याला आता वर्ष झालं. त्या वर्षाबद्दल मी समाधानी आहे. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि पवार साहेबांच्या संपर्काचा मोठा फायदा झाला. (Mohite) त्यांनी सर्वांशी आमची ओळख करून दिल्याने काम करणं सोप गेलं असं म्हणत आपला खासदार म्हणून एक वर्षाचा पट माढा लोकसभेचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते यांनी लेट्सअप मराठीवर मांडला आहे. त्यांना अनेक विषयांवर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी बोलत केलं आहे.
तुम्ही पवार गटाचे खासदार आहेत. सत्ता भाजपची आहे. त्यामुळं काही दुजाभाव होतो का? यावर बोलताना मोहिते म्हणाले, असा कुठलाही दुजाभाव जाणवला नाही. सर्व खासदार, मंत्री सहकार्य करतात. तसंच, लोकांचा विश्वास असल्याचं कारण म्हणजे, मी कायम लोकांमध्ये असतो. लोकांच्या संपर्कात राहतो. प्रत्यक्ष असो किंवा फोनवर जसं जमेल तस मी लोकांच्या कामात मी प्रत्यक्ष हजर राहतो. त्याचाच मला नक्की फायदा होतो. त्यामुळच लेट्सअपच्या सर्वेमध्ये माझ्या बाजूने ६४ टक्के मत पडली असंही ते यावेळी म्हणालेत.
मोहिते पाटलांना रिझर्व बँकेचा दणका! शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा परवाना रद्द
यावेळी त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीवर झालेल्या विलंबावरही भाष्य केलं आहे. यावर बोलताना मोहिते पाटील म्हणाले, मला उमेदवारीसाठी विलंब झाला याचं कारण म्हणेज, मी मतदारसंघात फिरत होतो. आढावा घेत होतो. गाव-गाव त्यावेळी फिरत होतो. कारण, कुटुंबाने ठरवलं होत की, मतदारसंघातील लोकांची मोठी साथ असेल तरच उमेदवारी घ्यायची अन्यथा नाही असं मोहित यांनी यावेळी सांगितलं. तसंच, एका ठिकाणी तर तरुणांनी सांगितल की, यापुढं जर आमच्या गावात यायचं असेल तर उमेदवारी घेतली पाहिजे. नाहीतर येऊ नका इतक्या हक्काने लोकांनी सांगितलं म्हणून मी उभा राहिलो असंही ते यावेळी म्हणाले.
शहाजी बापू पाटील हे आमच्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळं त्यांचा मी आदरही करतो. त्यामुळं त्यांनी शिव्या दिल्या तरी आम्ही त्यांचा सन्मानच करतो असं म्हणत शहाजी बापू पाटील यांच्या टिकेवर मोहिते यांनी जास्त बोलण टाळलं आहे. यावेळी फडणवीस यांनी आकलुजमध्ये दिलेल्या इशाऱ्यावरही मोहिते पाटील यांनी भाष्य केलं आहे. त्यावर बोलताना, ते म्हणाले त्यांचा इशारा काही कामी आला नाही. तसंच, इशारा असा कुठंच काही आला नाही असंही ते म्हणाले. तसंच, रणजितसिंह निंबळकर स्वत:च स्वत:ला पदवी देतात. मात्र, ती लोकांनी द्यावी असा टोलाही मोहिते यांनी लगावला आहे.