लाडकी बहीण योजनेमुळे शेतकरी कर्जमाफीस विलंब; सरकारच्या मंत्र्यानच दिली आतली बातमी

Maharashtra Politics : राज्यात आता महायुतीचं सरकार स्थिरस्थावर झालं (Maharashtra Politics) आहे. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या काळात जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण करा असे म्हणत विरोधकांनी दबाव वाढवला आहे. लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण झालेलं नाही. तसेच शेतकरी कर्जमाफीचा मुद्दाही मागे पडला आहे. नुकतेच माजी आमदार बच्चू कडू यांनी (Bacchu Kadu) अन्नत्याग आंदोलन करत याकडे सरकारचं लक्ष वेधलं होतं.
यावर सरकारकडून नेमकी काय कार्यवाही सुरू आहे याची अधिकृत माहिती सध्या उपलब्ध नसली तरी सरकारमधीलच मंत्र्याने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारवर मोठा भार आहे. या योजनेमुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अद्याप घेता आलेला नाही असे वक्तव्य आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी (Prakash Abitkar) केले आहे.
Dhairyasheel Mohite Patil Exclusive : माढ्यात बदलाचे वारे; रणजीत मोहिते पाटील BJP सोडणार?
नेमकं काय म्हणाले आबिटकर ?
मंत्री आबिटकर यांनी आज प्रसामाध्यमांशी संवाद साधला. आबिटकर म्हणाले, राज्य चालवत असताना लाडकी बहीण योजनेसाठी निधीचा लोड येत आहे त्यामुळे कर्जमाफीसाठी उशीर होत आहे. शासन निर्णय घेईल तो सर्व शेतकऱ्यांच्या हिताचाच असेल. बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी काम करणारे लढवय्ये नेते आहेत. त्यांची तब्येत देखील महत्त्वाची आहे यासाठी उदय सामंत त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. सरकार कर्जमाफीसाठी वेळकाढूपणा करताय असं म्हणण्यापेक्षा सध्या सरकारवर फायनान्शिअल लोड आहे. सर्वच घटकातील लोकांना न्याय द्यायचा आहे यासाठी उशीर लागतो. उशीर लागतोय म्हणून त्याला वेळकाढूपणा म्हणणं योग्य होणार नाही.
वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार
पंढरपूरच्या वारीसाठी लाखो वारकरी येत असतात आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी आरोग्य विभागावर असते. ॲम्बुलन्ससह 1500 डॉक्टरांचा स्टाफ उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. चांगल्या पद्धतीने आरोग्य विभागाने याचे नियोजन केले आहे. कोरोना संदर्भात घाबरायची गरज नाही रुग्ण वाढत असतील तर जे काय केंद्र सरकारने एसीपी जारी करून दिलेली आहे त्यानुसार काळजी घेण्यात येईल असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित
शेतमालाच्या किमान दरावर 20 टक्के अनुदान, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ आणि 10 लाखाची आर्थिक मदत तसेच संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांग आणि विधवा महिलांना 6000 रुपये मानधन द्या, ग्रामीण भागातील घरकुलांसाठीही समान निकष, किमान 5 लाख अनुदान मिळावे, धनगर समाजाचे आरक्षण तात्काळ लागू करणे, धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13 टक्के आरक्षण मिळावे या मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. सहा दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन आज कडू यांनी काही काळासाठी स्थगित केले.
ब्रेकिंग : बच्चू कडूंचं आंदोलन तुर्तास स्थगित; सरकारला दिली 2 ऑक्टोबरची मुदत