Download App

जरांगेंनी नौटंकी बंद करावी, त्यांचा बोलवता धनी…; फडणवीसांवर आरोप होताच भाजपचे नेते आक्रमक

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज मराठा आरक्षणाच्या (Maratha Rservation) मुद्दावरून चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या या आरोपानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेत. भाजप आमदा प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली. जरांगेंनी नौंटकी बंद करावी, अशी टीका त्यांनी केली.

‘सागर’वर आल्यावर आम्ही शांत बसणार नाही’; जरांगे-फडणवीस वादात राणेंची खुलेआम धमकी 

आज माध्यमांशी बोलतांना लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, मनोज जरांगेंची पत्रकार परिषद पाहिली. जरांगेंनी आता त्यांची त्यांनी नौटंकी बंद करावी. समाजाच्या नावाखाली मागच्या सात आठ स्वत:चा राजकीय वरदहस्त करण्याचा प्रयत्न जरांगे पाटील करत होते. त्यांच्या मागचा बोलवता धनी कोण आहे? सिल्वर ओक आहे की, जालन्यातील भैय्या फॅमिली आहे हे आता लोकासमोर यायला लागला आहे, अशी टीका लाड यांनी केली.

Manoj Jarange : “मी कोणत्याच पक्षाचा नाही, मराठा समाजाला”… मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं

ते म्हणाले, आम्ही तुम्हाला दहावेळा सांगितले की, फडणवीसांचं नाव घेऊ नका. फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत. फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्या फडणवीसांचं नाव तुम्हाला कोण घ्यायला लावतं? हे आज जनतेसमोर यायला लागलं. पुन्हा एकदा 10 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळी संपली हे तुमच्या आजच्या पत्रकार परिषदेतून लक्षात येतं, असं लाड म्हणाले.

लेकरू म्हणून ढेकर देण्याचं बंद करा
तुमचं दु:ख लक्षात येतं. त्यामुळे समाजाच्या नावावर लेकरू लेकरू म्हणून ढेकर देण्याचं बंद करा. समाजाला कळले आहे. या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. समाज खूश आहे आणि तुमच्या सल्ल्याची समाजाला गरज नाही, असं म्हणत लाड यांनी जरांगेवर टीकास्त्र डागलं.

तर गप्प बसणार नाही – राणे
तर नितेश राणे म्हणाले, जरांगे यांना नेमकं मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत की फडणवीसांच्या नावावर राजकारण करायचे आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यापूर्वी त्यांना न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. त्यासाठी फडणवीसांचा मोठा आधार आहे. जरांगे यांनी कधीही शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली नाही. मात्र ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. तुम्ही सागर बंगल्यावर आलात तर आम्ही गप्प बसणार नाही, अशी धमकी नितीश राणेंनी दिली आहे.

जरांगेंचे आरोप काय?
जरांगे पाटील म्हणाले की, हे सर्व फक्त देवेंद्र फडणवीस करत आहेत. मराठ्यांचा दरारा पुन्हा निर्माण झाला आहे, हा दरारा संपवण्याचे त्यांचं स्वप्न आहे. यात एकनाथ शिंदे यांचेही दोन-चार जण आहेत. अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत.

मनोज जरांगेला संपवावा लागेल किंवा त्याचा गेम करावा लागेल. नसती याला बदनाम तरी करावं लागेल किंवा उपोषणात मरू द्यावं लागेल. हे फणवीसांचं स्वप्न आहे, असं जरांगे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनाना एवढी खुमखुमी असेल तर मी सांगर बंगल्यावर येतो, मला मारून दाखव, तुला माजा बळी पाहिजेन ना, मी येतो सागर बंगल्यावर. पण मी समाजोसोबतची ईमानदारी विकू शकत नाही, असं जरांगे म्हणाले.

follow us