Download App

मी गोळ्या खायला तयार, पण मागे हटणार नाही; मुंबईत आंदोलन करण्यावर जरांगे ठाम

तुम्ही समाजाची अडवणूक करू नका, मी मुंबईत येतोय, तुम्ही माझ्यावर गोळ्या घाला, मी मरायला तयार आहे, पण मी मागे हटणार नाही

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange : मनोज जरांगे (Manoj Jarange) अंतरवली सराटीतून सरकावर जोरदार हल्लाबोल केला. सरकारने परवानगी नाकारली म्हणजे आरक्षण देणं त्यांच्या जीवावर आलं. विनाकारण आपली अडवणूक केली जातेय. तुम्ही समाजाची अडवणूक करू नका, मी मुंबईत येतोय, तुम्ही माझ्यावर गोळ्या घाला, मी मरायला तयार आहे, पण मी मागे हटणार नाही, असं ते म्हणाले.

मी गोळ्या खालया तयार, पण मागे हटणार नाही; मुंबईत आंदोलन करण्यावर जरांगे ठाम 

फडणवीसांना त्यांची चूक झाकायची आहे, म्हणून मराठ्यांची अडवणूक केली जात आहे. देवी-देवतांच्या आडून गोरगरीब मराठ्यांवर अन्याय करणे आम्ही खपवून घेणार नाही, असंही जरांगेंनी ठणकावलं.

जरांगे म्हणाले, अशी लढाई जगाच्या पाठीवर झाली कधी नसेल. आपल्याला ही लढाई जिंकायचीच आहे. कितीही दिवस लागले तरी संघर्ष चालू ठेवायचा. आता थांबायचं नाही. शांततेत मुंबईकडे निघायचे. समाजाची मान खाली होईल असे एकानेही वागायचे नाही. आता आरपारची शेवटची लढाई लढायची अन् ही लढाई जिंकायची आहे, असं जरांगे म्हणाले.

यावेळी बोलताना जरांगेंनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, काही लोकांकडून राजकारण करण्यासाठी खऱ्या हिंदू लोकांना अडवलं जातंय. आपल्याला विनाकारण त्रास दिला जातोय. सरकार चूक झाकण्यासाठी देव-देवतांना पुढं करतयं. देव-देवताच्या नावांखाली आपली, अडवणूक केली जात आहे. आम्हीही हिंदू आहोत, आम्ही सर्व देवांची पूजा करतो. पण हिंदू देवांच्या नावाखाली आमचीच अडवणूक का? आज ज्यांना हिंदुत्त्वाशी देणंघेणं नाही, धर्माशी देणंघेणं नाही,ज्यांना फक्त राजकारणासाठी हिंदुत्त्व लागतं, ते खोटे हिंदू लोक हिंदू धर्म चालवणाऱ्यांनाही अडवत आहेत. मग खरं हिंदू विरोधी कोण आहे? याचे उत्तर मोदी शाह यांनी द्यावे, असं ते म्हणाले.

आता आरपारची लढाई, संयम ढळू देऊ नका; मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन 

मराठा आंदोलक शांततेत मुंबईला येत आहेत, पण हिंदू असूनही त्यांना त्रास दिला जात आहे. राज्य सरकारच सणाच्या दिवशी अशांतता पसरवत आहे. आम्ही काय धिंगाणा घालायला किंवा जमिनी घ्यायला मुंबईत येत आहोत का? मग आम्हाला रोखण्याचा अट्टाहास का? सरकार हिंदूविरोधी काम करत आहे. हिंदू सणांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये हे देखील आम्हालाही कळतं. गणेशोत्सवाला गालबोट लागेल, असं पाऊल आम्ही मेलो तरी उचलणार नाही.

आरक्षण द्यायला सरकारच्या जीवावर आलं…
पुढं जरांगे म्हणाले, सरकारला सणाच्या काळात अशांतता निर्माण करायची आहे. मुख्यमंत्र्यांकडून जाणूनबाजून आम्ही शांततेत येत असताना आम्हाला त्रास का दिला जातोय? तुम्ही यासाठी त्यांना बसवले आहे का? असा सवाल जरांगेंनी मोदींना केला.

नवा कायदा आणून सरकार अडवणूक करत आहे. कालच त्यांनी याचिका दाखल केली आणि कालच निकालही आला. परवानगी नाकारली. परवानगी नाकारायला, आम्ही काय दंगली करायला निघालोय का? सरकारने परवानगी नाकारली म्हणजे आरक्षण देणं त्यांच्या जीवावर आलं, असा हल्लाबोलही जरांगेंनी केला.

follow us