Download App

..अन् वादात अडकलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला; आमदार काळेंच्या प्रयत्नांना यश

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरसगाव येथील वादाच्या भोवऱ्यात अडकलेला रस्ता आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून खुला झाला

Kopargaon News : कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरसगाव येथील रस्ता मागील २५ वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. जवळपास ३० शेतकरी कुटुंबाच्या वर्दळीचा व शिवार वाहतुकीचा रस्ता आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा रस्ता खुला झाला आहे. शेतकरी कुटुंबांनी आमदार काळेंचे आभार मानले आहे. शिरसगाव येथील पालखेड चारी वन.एल.मायनर हद्दीत असलेला हा रस्ता कित्येक वर्षांपासून बंद होता. त्यामुळे या कुटुंबांना रस्ता नसल्यामुळे मोठ्या अडचणी येत होत्या.

याबाबत काही माहिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी आ. काळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना हा रस्ता खुला करण्याबाबत योग्य तो तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार तहसीलदार महेश सावंत यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी सहमती दर्शवत मागील २५ वर्षांपासून कौटुंबिक वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला.

बुधवारी (दि.२९) रोजी हा रस्ता शेतकऱ्यांना व नागरिकांच्या दैनंदिन वापरासाठी हा रस्ता खुला करण्यात महसूल प्रशासनाला यश आले. तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते पालखेड या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात येऊन हा रस्ता अखेर शिवार वाहतुकीसाठी कायमचा खुला झाला आहे.

आशुतोष काळेंच्या प्रयत्नांना यश, तिळवणीसह प्राथमिक आरोग्य केंद्रास 1.50 कोटींचा निधी मंजूर

या रस्त्यालगत २५ ते ३० शेतकरी वास्तव्य करत असून त्यांच्या शेतजमिनी याच रस्त्यावर असल्याने रस्त्याअभावी येथील स्थानिक शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. संबंधित रस्त्याच्या अडचणीबाबत योग्य पर्याय शोधून रस्त्याचा तिढा सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांची भेट घेत हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीची दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या सूचनेनुसार तहसीलदार महेश सावंत यांनी तत्परतेने हालचाली केल्या.

प्रमुख वादी असलेले व एकमेकांचे अतिशय जवळचे असणारे बोडखे व गायकवाड कुटुंबीय व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून समक्ष चर्चा केली. स्थानिक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेवून सदर रस्ता खुला होणे सर्वच शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सर्व शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तहसीलदार महेश सावंत यांनी केलेल्या मार्गदर्शनातून सर्वच शेतकऱ्यांचे मतपरिवर्तन होवून त्यांचा मागील २५ वर्षांपासूनचा वाद संपुष्टात येवून या रस्त्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे.

निळवंडे लाभ क्षेत्रातील सर्व पाझर तलाव लघू बंधारे भरून द्या; आमदार आशुतोष काळेंच्या सूचना

follow us