Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात आज (Ahmedabad Plane Crash) केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजारापू राममोहन नायडू (Kinjarapu Ram Mohan Naidu) यांनी पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती दिली. या अपघाताची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह सचिवांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून (Gujarat News) चौकशी करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेत आधी सचिव समरकुमार सिन्हा यांनी सांगितले की या विमानात एकूण 242 लोक (Air India) होते. यातील 230 प्रवासी, दोन पायलट आणि दहा क्रू मेंबर होते. दुपारी एक वाजून 39 मिनिटांनी पायलटने अहमदाबाद एटीसीला आपत्कालीन परिस्थितीची माहिती दिली होती. यानंतर जेव्हा एटीसीने विमानाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर एक मिनिटाने विमानाचा अपघात झाला होता.
Ahmedabad plane crash मधील मृतांचा आकडा वाढला; मेडीकल कॉलेजमधील 34 जणांचा मृत्यू
यानंतर केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले, आमच्यासाठी मागील दोन दिवस खूपच वाईट होते. मी स्वतः घटनास्थळी पोहोचलो आणि स्थितीची माहिती घेतली होती. प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेत उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. आम्ही प्रत्येक अँगलने घठनेच्या कारणांचा तपास करत आहोत. अशा दुर्घटना भविष्यात पुन्हा होणार नाहीत यासाठी काळजी घेत आहोत.
विमानाच्या पायलटने इमर्जन्सीची सूचना दिली होती. काल सायंकाळी पाच वाजता ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला. आता या बॉक्सची तपासणी केल्यानंतरच अपघाताचं कारण कळू शकेल. यासाठीच ब्लॅक बॉक्सला डिकोड केलं जात आहे. तीन महिन्यात तपास पथक अहवाल देणार आहे. डीजीसीए आणि आयबी अधिकारी देखील तपासाच्या कामात गुंतले आहेत. आम्ही आता घटनास्थळाला सील केले आहे आणि ब्लॅक बॉक्स हस्तगत केला आहे.
265 जणांचा जीव गेल्यानंतर DGCA ला आली जाग; बोईंगच्या सर्व विमानांची होणार तपासणी
विमानाला अपघात झाल्यानंतर आग लागली होती. या आगीत होरपळून प्रवाशांचा मृत्यू झाला. प्रवाशांचा मृतदेह ओळखणेही कठीण होते. अशा परिस्थितीत त्यांची डीएनए टेस्ट करून मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. आताच हाती आलेल्या माहितीनुसार 9 प्रवाशांचा डीएनए मॅच झाला आहे. तर एका प्रवाशाचा मृतदेह कुटुंबियांना देण्यात आला आहे. बाकीच्या मृतदेहांबाबतही कार्यवाही सुरू आहे. या मृतदेहांची ओळख पटल्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.