Indus river water will be available in Rajasthan Not To Pakistan : भारत सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला (Pakistan) मोठा मास्टरस्ट्रोक दिला. सिंधू पाणी करार थांबवला. त्यानंतर असा प्रश्न निर्माण (Indus river water) होतोय की, भारताने पश्चिमेकडील नद्यांचे पाणी थांबवले आहे, ते आता कोठे जाणार? कोणत्या भागाला मिळणार. अखेर मोदी सरकारने (Modi Sarkar) याचं उत्तर स्पष्ट केलं आहे.
शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत
सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर, भारताने पश्चिमेकडील नद्यांचे पाणी थांबवून ते राजस्थानमध्ये आणण्याच्या योजनेवर वेगाने काम सुरू केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा केली होती की तीन वर्षांत सिंधू नदीचे पाणी कालव्यांद्वारे राजस्थानमधील (Rajasthan) गंगानगरमध्ये नेले जाईल. त्यामुळे राजस्थानच्या मोठ्या भागात सिंचनाची सोय होईल. तेथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.
मोठी बातमी! पुण्याच्या कुख्यात गुंडाचा सोलापूरमध्ये एन्काऊंटर, शाहरुख शेख पोलिसांच्या गोळीबारात ठार
देशासाठी एक महत्त्वाचे पाऊल
सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर, भारताने पश्चिमेकडील नद्यांचे पाणी थांबवून ते राजस्थानमध्ये आणण्याच्या योजनेवर वेगाने काम सुरू केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घोषणेनंतर, जलशक्ती मंत्रालयाने चिनाब, रावी, बियास आणि सतलज लिंक कॅनाल प्रकल्पासाठी पूर्व-व्यवहार्यता अभ्यास सुरू केला आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट राजस्थानला पाणी आणणे आहे, हे देशासाठी एक महत्त्वाचे पाऊल असेल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी (Amit Shah) मध्य प्रदेशातील एखा भाजप प्रशिक्षण शिबिरात माहिती दिली की, तीन वर्षांत सिंधू नदीचे पाणी कालव्यांद्वारे राजस्थानमधील गंगानगरमध्ये आणले जाईल. यामुळे राजस्थानच्या मोठ्या भागात सिंचन सुविधा उपलब्ध होतील आणि पाकिस्तानला पाण्यासाठी तहान लागेल. खासदार आणि आमदारांना संबोधित करताना शाह यांनी हे सांगितले.
घरात बंद करून जिवंत जाळले, गोळ्या घातल्या… नायजेरियात बंदूकधाऱ्यांचा क्रूर हल्ला, 100 जणांचा मृत्यू
मोठी योजना
पश्चिमेकडील नद्यांचे पाणी वापरण्यासाठी सरकारने एक मोठी योजना आखली आहे. याअंतर्गत 200 किमी लांबीचे कालवे आणि 12 बोगदे बांधले जातील. सरकारने सिंधू नदीच्या खोऱ्याशी संबंधित प्रकल्पांच्या मंजुरीला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणीय मंजुरीसाठी एक खिडकी प्रणाली लागू केली आहे. याचा फायदा भारत आणि पाकिस्तानला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.