Download App

मायलेकाच्या नात्याला काळीमा! दोन मुलांनी आईला झाडाला बांधले अन् जिवंत जाळले

माणुसकी कुठ गेली असा प्रश्न पडावा अशी ही घटना आहे. दोन मुलांनी आपल्या 62 वर्षीय आईला जाळून टाकल्याची घटना पश्चिम त्रिपुरामध्ये घडली.

  • Written By: Last Updated:

Sons Killed Mother:  देश हादरवून सोडणारी घटना घडली आहे. माणुसकी कुठ गेली असा प्रश्न पडावा अशी ही घटना आहे. दोन मुलांनी आपल्या 62 वर्षीय आईला झाडाला बांधून कथितरित्या जिवंत जाळून टाकल्याची घटना पश्चिम त्रिपुरामध्ये घडली आहे. पोलीसांनी नुकतीच याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, आरोपी मुलांना अटक करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. कौटुंबिक वादातून हा गुन्हा घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चंपकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंबरबारी येथे ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेल्या पतीचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून ती आपल्या दोन मुलांसह राहत होती. तर त्यांचा तिसरा मुलगा आगरतळा येथे राहतो. जिरानियाचे उपविभागीय पोलीस आयुक्त कमल कृष्ण कोलोई यांनी सांगितलं की, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि झाडाला बांधलेला जळालेला मृतदेह बाहेर काढला.

Western Railway block: पश्चिम रेल्वेवर सोमवारी चार तासांचा ब्लॉक; अनेक लोकल रद्द

पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, आम्ही पीडित महिलेल्या दोन मुलांना या प्रकरणात त्यांच्या कथित सहभागासाठी अटक केली आहे. आरोपींना आज (सोमवारी) न्यायालयात हजर केलं जाणार असून, पुढील चौकशीसाठी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहे. दरम्यान, गेल्या काही काळात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. यातील काही घटनांमध्ये मुलांनी आई-वडिलांवर हल्ले केले आहेत. तर काही घटनांनामध्ये पालकांनी मुलांचे जीव घेतले आहेत. त्रिपुरामध्येच गेल्या वर्षी एका 40 वर्षांच्या महिलेने आपल्या दोन मुलांना विष पाजून मारलं होते. त्यानंतर या महिलेनेही जीवन संपवले होतं.

follow us