Imtiaz Jaleel : आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून पंढरपूरकडे दिंड्या रवाना होत आहेत. या वाऱ्यांबद्दल सोलापुर दौऱ्यावर असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azami) यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानानंतर राज्यभरातून टीका झाल्यानंतर आझमी यांनी वारकऱ्यांबद्दल केलेल्या विधानावर माफी मागितलीयं. त्यानंतर आता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel ) यांनी आझमींच्या या विधानावर आपली भूमिक स्पष्ट केलीयं. देवेंद्र फडणवीस हे अबू आझमींचा बोलवता धनी असल्याचा दावा जलील यांनी केलायं. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
Axiom Mission 4 भारतासाठी किती महत्त्वाचं?, कसा फायदा होणार?; जाणून घ्या सोप्या शब्दांत
पुढे बोलताना जलील म्हणाले, अबू आझमींना देवेंद्र फडणवीसांनी बोलायला लावलं आहे. अबू आझमी हा वेडा माणूस आहे. काहीतरी वक्तव्य करायची त्याला एक सवय झालेली आहे आणि काही दिवसांनंतर माफी मागायची, तो बोलतो कशाला? त्यांच्या मतदारसंघाबाबत का बोलत नाही? तुमचे लोकं कसे ड्रग्सचा धंदा करीत आहेत? यावर बोला, असं जलील म्हणाले आहेत.
तसेच याआधीच्या विधानसभा अधिवेशनातही आझमी यांनी समाजाचं काहीही देणंघेणं नसताना मतदारसंघाचं देणं नसताना औरंगजेबाचा मुद्दा काढला. अबू आझमी यांना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस बोलायला लावतात, त्यांचे बोलवते धनी शिंदे आणि फडणवीस आहेत. आताही अधिवेशन येतंय वारकरी समाजाबददल त्या मामसाला कळत नाही का? मी पत्रकार असताना अनेकदा पंढरपूरला कव्हर करण्यासाठी गेलो असल्याचं जलील यांनी स्पष्ट केलंय.
हल्ले बंद करा नाहीतर…., युद्धबंदी उल्लंघनावर डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्त्रायलला इशारा
काय म्हणाले होते आझमी?
पुण्याहुन प्रवास करीत असताना तुम्ही लवकर जा, कारण वारकऱ्यांची दिंडी येत असल्याचं कोणीतरी आम्हाला सांगितलं. ज्यावेळी एखाद्या मशीदीबाहेर मुस्लिम व्यक्ती नमाज पठण करीत असेल त्याची तक्रार केली जात आहे. आता वारकऱ्यांच्या दिंड्यांमुळे रस्ता जाम होतो त्यावर एकही मुस्लिम व्यक्त तक्रार करीत नाही, असं विधान आमदार अबू आझमी यांनी केलं होतं.
भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो…
मी सोलापुरात केलेल्या एका टिप्पणीच्या गैरसमजाबाबत स्पष्ट करतो की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलायं, वारकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो, माफी मागतो. माझा हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता. मी ए निष्ठावंत समाजवादी आहे. नेहमीच प्रत्येक धर्म, संस्कृती, परंपरेचा आदर करतो. वारीच्या परंपरेचं पालन करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करीत असल्याचं अबू आझमींनी म्हटलंय.