Download App

अजितदादांनी किमान एक गोष्ट तरी मान्य केली; ठाकरेंच्या नेत्याकडून भूमिकेचं स्वागत…

अजित पवार यांनी किमान एक गोष्ट तरी मान्य केली, स्वभावाप्रमाणेच भूमिका मांडल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते सचिन आहेर यांनी स्वागत केलंय.

Sachin Aaher : उपमुख्यमंत्री अजित पवार (Dcm Ajit Pawar) यांनी मराठी भाषेबद्दल घेतलेल्या भूमिकेचं स्वागतच करत असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते सचिन आहेर (Sachin Aaher) यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकलायं. सध्या राज्यात हिंदी सक्तीवरुन घमासान सुरु असल्याचं चित्र आहे. अशातच आता हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे मोर्चा काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनीही हिंदी सक्तीविरोधात भूमिका घेतलीयं. त्यामुळे अजितदादांच्या भूमिकेचं आता ठाकरे गटाच्या नेत्यांकडून स्वागत केलं जात आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या ३००व्या जयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

पुढे बोलताना सचिन आहेर म्हणाले, किमान एक गोष्ट तरी अजितदादांनी मान्य केली, आम्ही मांडलेला मुद्दा रास्त होता. मराठी भाषावर प्रेम करणाऱ्या सर्वच राजकीय नेत्यांचीही भूमिका हीच आहे. अजितदादा त्यांच्या परखड स्वभावाप्रमाणेच बोललेले आहेत. अजितदादांच्या भूमिकेचं स्वागतच आहे. सरकार बोलतंय एक आणि करतंय एक. अनिवार्यचा अर्थ अप्रत्यक्षात ही सक्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, एकीकडे एक उपमुख्यमंत्री बोलत आहेत, पण दुसरीकडे दुसरे उपमुख्यमंत्री बोलत नाहीत, असं सचिन आहेर म्हणाले आहेत.

आधी नोकरीचे आमिष, मग बलात्कार केला; पद्मश्री कार्तिक महाराजांवर महिलेचा गंभीर आरोप

तसेच सत्ताधारी आधी मुद्दा एक आणि मोर्चे दोन म्हणत होते, आता एकच मुद्दा आणि एकच मोर्चा आहे. सत्ताधारी लोकं दिशाहीन करण्याचा प्रयत्न करताहेत. मूळ विषयावरुन बगल देण्याचं काम करत आहेत. आमच्यावर आरोप करीत आहेत. पण प्रशासन समिती स्थापन केल्यानंतर समितीच्या अहवाल मान्य करायचा की नाही याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा होत असते, त्यानंतरच जीआर काढला जात आहे. आमच्या सरकारच्यावेळी कोणताही जीआर निघालेला नाही. फडणवीस सरकारने आता जीआर काढलायं, या जीआरचा होळी करण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचंही सचिन आहेर यांनी म्हटलंय.

बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन! हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सत्ताधारी आपल्या राज्यातच का हिंदीची सक्ती करीत आहेत, तामिळनाडूत का नाही? गोव्यात ही भूमिका का नाही? जे तिकडे प्रांताशी संबंधित जिकडे त्यांचा फायदा त्याच ठिकाणी ते सक्ती करीत आहेत. हा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी उठवलायं. हिंदीची सक्ती झाली तर लोचा होणार असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आता याबाबत काय अध्यादेश निघणार हे महत्वाचं असल्याचं सचिन आहेर म्हणाले आहेत.

follow us