Download App

राज्यात तीन चाकी रिक्षा चालते ज्याचे नाव ‘मविआ’आहे…पण त्याचे तिनही टायर पंक्चर

Amit shah : केद्रीय गृहमंत्री अमित शाह Amit shah यांनी जळगावमध्ये (Jalgaon)आयोजित जाहीर सभेत महाविकास आघाडीवर (mva)घणाघाती टीका केली. महाराष्ट्रात (Maharashtra)तीन पायांची रिक्षा चालते. त्याचं नाव महाविकास आघाडी आहे. त्या रिक्षाचे तीनही चाकं पक्चर आहेत. आणि महाराष्ट्रात पंक्चर झालेली रिक्षा विकास करु शकते का? असा खोचक सवाल यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यानी उपस्थित केला.

सारा आणि करिश्मा अडकणार संशयाच्या भोवऱ्यात; ‘मर्डर मुबारक’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपच विकास करु शकते. यावेळी अमित शाह यांनी कॉंग्रेससह शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली.

महाराष्ट्राची जनता पवारांचं ओझं वाहतेय, त्यांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा; अमित शाहांची तोफ धडाडली

यावेळी शाह म्हणाले की, पवारसाहेब मोदींना 10 वर्ष झाली आहेत. 50 वर्षापासून महाराष्ट्राची जनता तुम्हाला सहन करत आहे. तुम्ही पन्नास वर्ष सोडा फक्त पाच वर्षांचाच जनतेला हिशोब द्या असं थेट आव्हानही शरद पवार यांना दिलं. मी तर या ठिकाणी 10 वर्षांचा हिशोब द्यायला आलो आहे, असे अमित शाह म्हणाले.

नरेंद्र मोदींकडे 10 वर्षाचा हिशोब पण आहे, त्याचबरोबर पुढील 25 वर्षाचं व्हिजन देखील आहे. असा नेता देशाला परत परत मिळणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित, समृद्ध करण्याचं काम मोदींनी केले आहे.

यावेळी सभेमध्ये अमित शाह यांनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करुन केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऋणांतून देश कधीच मुक्क होऊ शकत नाही. भाजपला मत म्हणजे युवकांच्या उज्वल भविष्याला मत, भाजपला मत म्हणजे मोदींना पतंप्रधान करण्यासाठीच, युवकांनो तुमचं मत त्याचं पक्षाला द्या जो पक्ष भारत भूमीला जगाच्या सर्वोच्च ठिकाणी बसवेल, असं आवाहन अमित शाह यांनी युवकांना केलं आहे.

follow us