Download App

स्वकर्तृत्वावर तयार झालेले पवार अन् काकांच्या सावलीत वाढलेल्या दादांमध्ये मोठं अंतर, आव्हाडांचा हल्लाबोल…

Jitendra Awhad : अजितदादांनी बारामती दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्याशी आपल्या तुलना केली. अजितदादांनी (Ajit Pawar)राष्ट्रवादीमध्ये केलेल्या बंडाची तुलना शरद पवारांनी 1978 मध्ये घेतलेल्या निर्णयाशी केली आहे. यावेळी अजितदादा म्हणाले की, काहींनी तर 38 व्या वर्षीच वेगळी भूमिका घेतली. आम्हीतरी 60 वर्ष पार केल्यानंतर ही भूमिका घेतली. त्यावरुन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून टीका अजितदादांवर टीका सुरु झाली आहे. अजितदादांच्या या वक्तव्याला शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहून घणाघाती हल्लाबोल केला आहे.

व्हायरल संगीतकार ते अभिनेता म्हणून तोंडभरून कौतूक, अपारशक्तीसाठी 2023 ‘या’ कारणाने ठरलं खास

स्वकर्तृत्वावर तयार झालेले शरद पवार आणि काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार यांच्यात बरंच अंतर आहे, असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांवर चांगलीच तोफ डागली आहे. साहेबांनी ज्या वयात काही निर्णय घेतले त्या वयात तुम्हाला ते करताही आलं नसतं आणि त्यांनी जे केलं ते तुम्हाला 63 व्या वर्षीही जमलं नाही, असा खोचक टोलाही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांना लगावला आहे.

आव्हाडांच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? :
साहेब जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा ते 38 वर्षांचे होते. पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद, या आघाडीची कल्पना ही समाजवादी नेते एस.एम. जोशी यांनी पुढे आणली. नाशिकराव तिरपुडे हे वसंतदादांना देत असलेल्या त्रासाबद्दल मंत्रिमंडळात उघड चर्चा होती. पण, त्या काळात दिल्लीच्या हायकमांडमध्ये नाशिकराव तिरपुडेंचा दबदबा होता. अशा परिस्थितीत काहीतरी केलं पाहिजे, असे सर्वच पुरोगामी नेत्यांना वाटत होते. अन् यशवंतराव चव्हाणांनी मान हलवल्यानंतरच पुढील घडामोडी घडल्या.

Nana Patole : ‘त्यांना गांभीर्याने घेऊ नका’, पटोलेंचा नाना पाटेकरांना टोला

यामध्ये सर्वात मोठी भूमिका एस.एम. जोशी यांची असल्याकारणाने त्यांनी शरद पवार साहेब यांचे नाव सुचविले. त्यावेळेस असलेल्या जनता पार्टीची निर्मिती ही जयप्रकाश नारायण यांनी केली होती. अन् जनसंघ हादेखील जनता पार्टीत विलीन केला होता. जनसंघाचे अस्तित्व संपले होते आणि भारतीय जनता पार्टीची निर्मिती व्हायची होती. त्यामुळे कुठलाही जातीयवादी पक्ष हा पुलोदचा भाग नव्हता.

अर्धवट माहितीच्या आधारे साहेबांवर आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की साहेबांनी कधीच जातीयवादी पक्षांशी हातमिळवणी केली नाही. कारण की, सन 1981 मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. त्या आधीच पुलोदचे सरकार बरखास्त होऊन दुसरे सरकार सत्तेवर आले होते. त्यामुळे अजितदादांनी स्वतःची तुलना साहेबांच्या निर्णयाशी करावी, हे जरा हास्यास्पदच वाटतेय. एवढ्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री होणे आणि समान तत्वावर सरकार चालवणे, ही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळेस उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळप, दि. बा. पाटील, एस.एम. जोशी, ना.ग. गोरे असे दिग्गज नेते महाराष्ट्राच्या राजकारणात होते.

स्वकर्तृत्वावर तयार झालेले शरद पवार आणि काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार यांच्यात बरंच अंतर आहे. त्यामुळे साहेबांनी ज्या वयात केले; त्या वयात तुम्हाला ते करताही आले नसते आणि त्यांनी जे केले ते तुम्हाला 63 व्या वर्षीही जमले नाही तुम्ही कितीही शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेतले तरी उजव्या मांडीवर कोण आणि डाव्या मांडीवर कोण, हे महाराष्ट्रातील प्रत्येक पुरोगामी माणसाला कळतंय.

आधी थोडीशी माहिती करून घेतली असती तर अशी गल्लत झाली नसती आणि या सर्व प्रकरणाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची मान्यता होती. त्तेव्हा राजकारण म्हणजे साखर कारखाना; राजकारण म्हणजे बँका ; राजकारण म्हणजे इथेनॉल फॅक्टरी; राजकारण म्हणजे सहकारी उद्योग असे समीकरण तेव्हा नव्हते तर महात्मा गांधीजींचा वारसा घेऊन चाललेले नेते हे समाजसेवेचे व्रत घेऊन पुढे जात होते. हाच आजच्या आणि तेव्हाच्या राजकारणातला फरक आहे.

follow us