Praphul Patel on Congress at Ncp 26th Anniversary Celebration : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज 26 वा वर्धापन दिन अजित पवार गटाकडून पुण्यात साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्यात बोलताना पक्षाचे खासदार प्रफुल पटेल (Praphul Patel) यांनी बोलताना पहलगाम हल्ला आणि जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर त्यांनी याच मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं आहे.
काय म्हणाले प्रफुल पटेल?
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला 26 वर्ष पूर्ण होत आहेत. हा छोटा प्रवास नाही. तर मोठा आहे. आजही आपल्या पक्षात दररोज नवनवे लोक जोडले जात आहेत. तसेच आपण आणखी जास्तीस जास्त लोकांना आपल्या सोबत आणूया. तर दुसरीकडे काल NDA चा 11 वर्ष पुरतीचा दिवस होता. आता आपण देखील याच एनडीएचा भाग आहोत. पण आपण अडीच वर्षांपूर्वी जो निर्णय घेतला ही वाटचाल नवीन नव्हती. 2014 साला नंतर अनेक वेळा आशा घडामोडी झाल्या होत्या. त्या सर्वांच्याच मनात होत्या.
आपण शिव, शाहु फुले आंबेडकर विचारांचेच आहोत, पण… काय म्हणाले अजित पवार?
याठिकाणी मी पक्ष आणि एनडीए, युपीएवर बोलणार नाही. पण गेल्या काही दिवसांपूर्वी काश्मिरमध्ये आपल्या भारतीय नागरिकांना धर्माच्या आधारावर निर्घृणपणे मारण्यात आलं. त्यावर तात्काळ प्रतिउत्तर काय असावं याचं उदाहरण म्हणजे पंतप्रधान मोदी हे. कारण केंद्रातील मनमोहन सररकारच्या काळात प्रतिउत्तर दिले नव्हते मात्र मोदी यांनी ते करून दाखवलं. तसेच आपण जरी एनडीएसोबत आलो असलो तरी देखील आपण पुरोगामी विचार सोडले नाही. पण विरोधक हे सरकार आणि आमच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचे सुरूच ठेवलेले आहे.
दुसरीकडे जात निहायजनगणनेचा मुद्दा देखील तसाच आहे. कारण केंद्रात काँग्रेस सरकार असताना त्यांनी काय जाती निहाय जनगणना केली नाही. पण या मुद्द्यावरून ते सरकारवर टीका करत होते. तसं पाहिलं तर कॉंग्रेसचं सरकार असतातनाच 2011 साली जनगणना झाली होती. त्यावेळीच जातनिहाय जनगणना होऊ शकली असती. पण त्यांनी ती केली नाही. तर आता पंतप्रधान मोदी यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जाती निहाय जनगणगा होत आहे. असं म्हणत प्रफुल पटेल यांनी बोलताना पहलगाम हल्ला आणि जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे.