Video : आपण शिव, शाहु फुले आंबेडकर विचारांचेच आहोत, पण… काय म्हणाले अजित पवार?

NCP 26th Anniversary : मला आज तो दिवस आठवतोय. 199 ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यावेळी आपण काँग्रेससोबत गेलो होतो. कारण, एका पक्षाला सत्ता स्थापण करता येईल (NCP) हे दिवस तेव्हापासून महाराष्ट्रात नाहीत. कोणताही पक्ष असो आपल्याला हे मान्य करावं लागेल असं म्हणत अजित पवार(Ajit Pawar Latest News) यांनी पक्षासह विकासावर भाष्य केलं. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनाच्या आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
मी सर्व कार्यकर्त्यांना सांगतो की, आपला पक्ष शिव, शाहू फुले आंबेडकर यांच्याच विचारांचा आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेच्या राजकार करणारा पक्ष आहे. आज काही लोक विचारतात की तुम्ही तर भाजपसोबत गेला आहात मग कसं? यावेळी अजित पवार यांनी २०१९ च्या महाविकास आघाडीची आठवण करत आपला पक्ष शिवसेनेसोबत गेला होताच ना अशी तुलना करत आपण केलं ते कसं योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. तसंच, त्यांनी यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबु यांचं, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भाजपसोबत गेल्याचे उदाहरण दिली.
जयंत पाटलांचा राजीनामा अन् पत्र दोन्हीही; सुप्रिया सुळेंनी सांगितली पडद्यामागची महत्त्वाची घडामोड
जर राजकारणात राहून विकास करायचा असेल तर सत्ता महत्वाची आहे. फक्त घोषणा देऊन, सत्तेच्या बाहेर राहुन सरकारवर टीका करून या गोष्टी करता येत नाहीत असं म्हणत आपण सत्तेतच असलं पाहिजे या गोष्टीचं समर्थन अजित पवार यांनी केलं आहे. त्यासोबतच आमच्याबद्दल वेगवेगळी टीका होते. आम्हाला विनाकारण काही कारण नसताना बदनाम करण्याचं काम केलं जात. कुणाचाही निधी वळवला अशा बातम्या देऊन टीका केली जाते. मात्र, आम्ही कुणाचाही निधी वळवला नाही असंही अजित पवार म्हणाले.Ajit Pawar Latest News