Hindi Language Controversy : राज्यात हिंदी भाषेचा विरोध सातत्याने वाढू (Hindi Language) लागला आहे. राज्य सरकार इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा (Hindi Language Controversy) म्हणून हिंदी विषयाचा समावेश करणार आहे. सरकारच्या याच धोरणाला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. मनसेने 5 जुलैला भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. उद्धव ठाकरेही 7 जुलै (Uddhav Thackeray) मराठी भाषा समन्वय समितीच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
— harshalpradhan (@harshalpradhan7) June 27, 2025
काँग्रेसही मोर्चांना (Congress Party) पाठिंबा दिला आहे. या सगळ्या घडामोडींनंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनीच स्वीकारलं होतं असा दावा मंत्री सामंत यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे प्रवक्त हर्षल प्रधान यांनी जोरदार पलटवार केला आहे.
“हिंदी सक्तीचं धोरण उद्धव ठाकरेंनीच स्वीकारलं होतं” उदय सामंतांच्या दाव्याने खळबळ!
प्रधान यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी डॉ. माशेलकर समितीच्या प्रस्तावाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंमलबजावणीसाठी ऑक्टोबर 2020 मध्ये शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेत 19 सदस्यीय टास्क फोर्स स्थापन केली आणि त्यांचा अहवाल स्वीकारला. पण याचा अर्थ सर्व सूचनांवर अंमलबजावणी केली जाईल असा नाही. यातल्या ज्या सूचना योग्य असतील त्यावर नक्कीच अंमलबजावणी केली जाईल. तशी सुरुवातही उद्धवसाहेबांनी केली होती. मात्र भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडले.
आज केवळ राजकारणासाठी भाजप त्या अहवालाचा आधार घेत आहे. पण त्या अहवालातील इतर सूचनांचा भाजपला विसर पडला आहे. भाजप केवळ हिंदी सक्तीचा आग्रह धरुन मराठी माणसांना डिवचत आहे. त्यांचा हा डाव राज्यातील जनता ओळखून आहे. भाजपला उद्धवसाहेबांना टार्गेट करण्याशिवाय दुसरे काम राहिलेले नाही. भाजपला उद्धव ठाकरेंची भीती वाटते हेच खरं आहे. “ये डर अच्छा है!” असे हर्षल प्रधान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
वणवा पेटण्यास सुरूवात, राजसाहेबांचा विजय असो; हिंदी सक्तीविरोधात भाजपात पहिला राजीनामा