“हिंदी सक्तीचं धोरण उद्धव ठाकरेंनीच स्वीकारलं होतं”, उदय सामंतांच्या दाव्याने खळबळ!

Uday Samant Hindi Language Controversy : राज्यात हिंदी भाषेचा विरोध सातत्याने वाढू लागला आहे. राज्य सरकार इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा (Hindi Language Controversy) म्हणून हिंदी विषयाचा समावेश करणार आहे. सरकारच्या याच धोरणाला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. मनसेने 5 जुलैला भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. उद्धव ठाकरेही 7 जुलै (Uddhav Thackeray) मराठी भाषा समन्वय समितीच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. काँग्रेसही मोर्चांना पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारने पाचवीपर्यंत हिंदी भाषेचा हट्ट सोडावा असे शरद पवार म्हणाले आहेत. या सगळ्या घडामोडींनंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. हिंदी भाषा सक्तीचं धोरण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच स्वीकारले होते, असा दावा त्यांनी केला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदी भाषेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. सामंत म्हणाले, राज्यात शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचं धोरण मविआ सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मु्ख्यमंत्री असतानाच स्वीकारलं होतं. डॉ. माशेलकर समितीचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनीच कॅबिनेटमध्ये स्वीकारला होता. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीने शिकवल्या पाहिजेत असा प्रस्ताव माशेलकर समितीचा होता. हा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी स्वीकारला होता.
परंतु, आता हिंदी भाषेची सक्ती नाही. तरीदेखील ठाकरे गटाकडून जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे. हिंदी सक्ती करायची नाही तसेच हिंदी अनिवार्य देखील करायची नाही अशी सरकारची भूमिका आहे. परंतु, आता महापालिका निवडणुका जवळ आल्याने या मुद्द्यावर राजकारण केले जात आहे, असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला.
हिंदी सक्तीचा विरोध! मराठी समन्वय समितीला उद्धव ठाकरेंची साथ; 7 जुलैच्या आंदोलनात होणार सहभागी
मनसेच्या मोर्चाच्या तारखेत बदल
हिंदी भाषा सक्तीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांन आज सकाळी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. खुद्द राज ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. पहिले मनसेकडून 6 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता हा मोर्चा 6 जुलै ऐवजी 5 जुलै रोजी काढण्यात येणार आहे.
राजकीय खलबतांनंतर तारखेत बदल?
एकीकडे आज (दि.26) सकाळी राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत 6 जुलै रोजी भव्य मोर्चा आयोजित करत असल्याची घोषणा केली होती. मात्र, अवघ्य काही तासातच या मोर्चाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. मोर्चाची तारीख फक्त बदलण्यात आली आहे. मात्र, ठिकाण आणि वेळ तीच असल्याचे राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. परंतु, राजकीय खलबतांनंतर राज ठाकरेंनी यू-टर्न घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
“पहिली ते तिसरीपर्यंत..”, शिक्षणमंत्र्यांचं हिंदीबाबत मोठं वक्तव्य, दादा भुसेंनी काय सांगितलं?