Download App

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, इंजिन आणि मशाल…

Ajit pawar On Raj And Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार अशी

Ajit Pawar On Raj And Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. तसेच शिवसेना ठाकरे गट (Shivsena) आणि मनसेमध्ये (MNS) युती होण्याचे संकेत दोन्ही पक्षांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे जर दोन्ही पक्षात युती झाली तर याचा फायदा कुणाला होणार आणि कुणाला याचा फटका बसणार याबाबात राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर भूमिका मांडली. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार यांनी यावेळी राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर देखील भूमिका मांडली.

ठाकरे बंधू एकत्र येणार का? या प्रश्नावर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की,  राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघेही एकमेकांच्या पक्षांचे प्रमुख आहेत. इंजिन आणि मशाल यांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे.  तुम्ही आणि मी विचार करून काय उपयोग आहे. त्या त्या संदर्भातला निर्णय त्यांचे त्यांच्या पक्षाचे प्रमुख घेतील. असं अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

ते मला अजिबात आवडलं नाही

तर दुसरीकडे अजित पवार यांनी यावेळी लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यात सुरु असणाऱ्या वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यात जे काही संभाषण झालं ते मला अजिबात आवडलं नाही.  सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसा असल पाहिजे याचा विचार करण्यात यावा, बोलताना प्रत्येकाला तारतम्य असलं पाहिजे काहीजणांमध्ये विकृती असते त्याला जास्त महत्व द्यायचं कारण नाही. असं अजित पवार म्हणाले.

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मंत्री संजय शिरसाट यांना टोला

माध्यमांशी बोलताना लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं म्हटले आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी स्टेटमेंट दिल आहे ते तुम्ही ऐकलं नाही का ? मुख्यमंत्री जे बोलतात ते अंतिम असतं. कारण नसताना काहीजण चुकीची चर्चा करत आहेत. आम्हीही प्रचंड बहुमताने निवडून आलेलो आहोत. कुठल्याच घटकांवर अन्याय आम्ही करणार नाही सगळ्यांना नाही दिला जाईल.

रेपो दरात कपात, सर्वसामान्य माणसांना फायदा काय? जाणून घ्या सर्वकाही 

अर्थसंकल्पामध्ये सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाला आपण यंदा  39 ते 41 टक्के वाढ करून अधिक निधी दिला आहे.  माझ मंत्र्यांना सांगणं आहे की कॅबिनेट बैठक असते इतर ठिकाणी बोलण्यापेक्षा त्या व्यासपीठावर येऊन आपलं मत मांडलं पाहिजे. तर समज गैरसमज होणार नाहीत. काही जण नाही चुकून बोलून जातात. जर कोणाची तक्रार करायची असेल तर आम्हा सगळ्यांसमोर करा म्हणजे आम्हाला पण कळेल. जर का असं केलं नाही तर चुकीच्या बातमी लागतात. अशा बातम्यांना विषय मिळतो आणि बातम्या सुरू होतात. असं म्हणत त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांना टोला लावला.

follow us