Download App

नदी सुधार प्रकल्पामध्ये दुसऱ्या राज्यांचा विकास दडलाय? पुण्यातील पुरस्थितीवरून आदित्य ठाकरेंचा टोला

Aditya Thackery आज पुण्यातील पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील पुरस्थितीवरून सरकारवर निशाणा साधला

Aditya Thackery Criticize government on Pune Flood : पुण्यातील पूरस्थिती (Pune Flood) ही नदी सुधार प्रकल्पांमुळे निर्माण झाली आहे. मात्र त्यामध्ये बाहेरील राज्यांचा विकास दडला आहे का? असा सवाल करत पुण्यातील पुरावरून आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackery ) सरकारवर निशाणा साधला आहे. ते आज पुण्यातील पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी बोलत होते.

FIR मध्ये राज ठाकरेंचं नाव घेत मिटकरींची फिर्याद; गाडी फोडणाऱ्या मनसैनिकाचाही झाला मृत्यू

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, अनेक काम नदी पात्रात सुरू असतात किंवा राडारोडा असतो. या सरकारने अंधेरी पांपिग स्टेशन कामाला स्थगिती दिली आहे. दोन पाच वर्षात पाऊस प्रमाण वाढलं आहे,. पूरस्थितीवर लक्ष ठेवून काम करण्यासाठी कोणी तरी पहिला पाहिजे. यात पालकमंत्री पण असतात.

उद्या मनिका बत्रा, पीव्ही सिंधू गाजवणार मैदान, एका क्लीकवर जाणून घ्या भारताचे वेळापत्रक

माविआ सरकारने पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती दिली होती,यावर उपाय एकच आहे आता या प्रकल्पाला स्थगिती दिली पाहिजे.कारण यातील अनेक गोष्टी बघितल्या नाहीत,त्यात द्रुरुस्थी सागितली होती,आता घरात पाणी येत आहे या कामामुळे दुसऱ्या राज्यातील लोकांचा विकास या नदी सुधार प्रकल्पामध्ये दडला आहे का हे पाहायला हवा. नाल्यावर अनेक बांधकाम होत असतात. त्याबद्दल पण काही तर नियमावली हवी.

ज्यांना कळत त्याच्याशी चर्चा करू,कॉन्ट्रॅक्टर भाषा कळत नाही मला. अनेक शहरातील प्लॅन तयार केले होते अनेकाशी बोलून. गोंडस प्रेझेंटेशन दिलेलं असत नदी सुधार प्रकल्प बाबतचे,फसवून असे प्रोजेक्ट दिला असेल,ज्यांनी दिलं त्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आंदोलन करणार म्हणजे काय करणार,आता काम सुरू आहे. आम्ही आंदोलन करू पण नदीची वाट लागते. याला जबाबदार कोण? असा देखील सवाल आदित्य यांनी केला.

follow us