Ajit Pawar Malegaon Sugar Factory candidate for chairman : अजितदादा पवार. (Ajit Pawar) सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री. अर्थमंत्री म्हणून राज्याची तिजोरीही त्यांचाच हातात. याच अजितदादांना आता साखर कारखान्याचे चेअरमन व्हायचंय. तो कारखाना आहे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना. ( Malegaon Sugar Factory) या कारखान्याचे अध्यक्ष होऊन अजितदादांना मोठी खेळी करायची आहे का? यापूर्वी मोठ्या पदावर राहिलेले कोणी कारखान्याचे चेअरमन होते का (Sugar Factory candidate for chairman) ? हेच या व्हिडिओतून पाहुया…
दोन मुख्यमंत्री पदावर असताना साखर कारखान्यांचे चेअरमन
तसा विचार केला तर सध्याचे नेते हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, राजेश टोपे हे आपआपल्या भागातील कारखान्यांचे चेअरमन आहेत. मंत्री हसन मुश्रीफ हे तर जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत.तर दोन मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात कारखान्यांचे अध्यक्षपद सांभाळले. दिवंगत वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या भागातील साखर कारखान्याचे चेअरमन होते. तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे पदावर असताना साखर कारखान्याचे चेअरमन होते. त्याच प्रमाणे अजितदादांना आता कारखान्याचे चेअरमन व्हायचंय. (Ajit Pawar Malegaon Sugar Factor candidate for chairman)
अजितदादांकडे खासगी कारखाने, माळेगाव का हवाय ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अनेक जिल्ह्यात खासगी साखर कारखाने आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात अंबालिका कारखाना हा अजितदादांचा आहे. अजितदादा पवार यांचे खासगी कारखाने दरवर्षी 46 लाख टन ऊस गाळप करतात. माळेगाव कारखाना दरवर्षी 13 लाख टन ऊस गाळप करतो. हा कारखाना अजितदादांनी पुन्हा ताब्यात घ्यायचा आहे. हा कारखाना त्यांच्याकडे आल्यास 60 लाख टन ऊस गाळप क्षमता असलेले कारखाने अजितदादांकडे असतील. त्यातून साखरेचा किंवा ऊसाचा दर ठरविताना अजितदादांची भूमिका महत्त्वाची असेल. त्यामुळे अजित पवार यांना माळेगाव कारखान्याचे अध्यक्षपद हवे आहे. केवळ साखर दर नाही तर त्याला राजकीय किनारही आहे.
चंद्रराव तावरे व अजितदादांचा संघर्ष
आतापर्यंत हा कारखाना अजितदादांच्या ताब्यात राहिलेला आहे. 1991 पासून 2025 पर्यंत तब्बल 35 वर्षांच्या कार्यकाळात 25 वर्ष हा कारखाना अजितदादांकडेच आहे. अजितदादा राजकारणात सक्रीय झाल्यानंतर शरद पवार यांचे जुने मित्र चंद्रराव तावरे यांना त्यांनी माळेगावपासून दूर केले. तेथूनच अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे असा संघर्ष सुरू झाला. आतापर्यंत चंद्रराव तावरे यांनी दोन वेळेस अजितदादांचा पॅनेल पराभूत करत दोनवेळा कारखाना आपल्या ताब्यात घेतलाय. आता मात्र अजितदादांना पाहायचे आहे ग्राउंडला आपली ताकद किती आहे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात पाच वर्षांत नऊ हजार कोटींचा कामे केलीत. मी विकासकामे करत असताना विरोधकांना मते का मिळतात हेच पाहायचे आहे, असे अजितदादा जाहीरपणे सांगतायत.
अजितदादाच बारामतीचा बॉस हे दाखवून द्यायचंय
माळेगाव कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान होणार आहे. या कारखान्याचे मतदार आहेत 19 हजार 549 इतकी. पण अजितदादांनी मतदान होऊपर्यंत माळेगावच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी तळ ठोकलाय. ते कारखान्यांच्या सभासदांना घरोघरी जावून भेटत आहेत.अजितदादांनी ही निवडणूक गांभीर्याने का घेतली त्याला अनेक कारणे आहेत. त्यात शरद पवार यांची साथ नसतानाही माळेगावची निवडणूक अजितदादांना जिंकून दाखवयाचीय. एकत्र निवडणूक लढण्याची ऑफर सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना दिली होती. त्यासाठी त्यांनी अजितदादांना फोनही केला होता. परंतु त्यांनी तो घेतलाय नाही, अशी राजकीय चर्चा आहे.
कट्टरविरोधकाला घेतले बरोबर
बारामती विधानसभा जिंकल्यानंतर स्थानिक सहकारी संस्था आपल्या ताब्यात ठेवण्याचा चंग अजितदादांनी बांधलाय. त्यासाठी ते ग्रामपंचायत निवडणुकीसारखे घरोघरी फिरत आहेत. वेळप्रसंगी कट्टरविरोधक बरोबर घेतयात. बारामती तालुका व इंदापूर तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या छत्रपती सहकारी कारखान्याची निवडणूक नुकतीच झाली. आपले कट्टरविरोधक असलेले पृथ्वीराज जाचक यांना आपल्या पॅनेलमध्ये घेतले. चेअरमनपदाची ऑफर दिली आणि पॅनेल जिंकून आणला.
माळेगावसाठी चौरंगी लढत
माळेगावची निवडणूक सोपी जावी, यासाठी अजितदादांनी खेळी करण्याचा प्रयत्न केलाय. परंपरागत विरोधक चंद्रराव तावरे यांना चेअरमनपदाची ऑफर दिली. पण कसलेले खेळाडू तावरे यांनी ही ऑफर नाकारलीय. त्यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. या निवडणुकीसाठी चार पॅनल आमने-सामने आलेत.अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री निळकंठेश्वर पॅनल, शरदचंद्र पवार पक्षाचा बळीराजा शेतकरी पॅनल , चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव शेतकरी पॅनल आहे. शेतकरी बचाव समितीचे एक पॅनल अशा चार पॅनलमध्ये चौरंगी लढत होतेय. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका कारखान्यासाठी ताकदपणाला लावलीय. आता मतदार अजितदादांना स्वीकारते की सत्ता बदल करते हे 24 जूनला होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होईल.