Download App

क्रिकेटमध्ये मोठे बदल, आता एका चुकीमुळे संपूर्ण संघाला बसणार फटका, 5 धावा कमी होणार

New Rules In Cricket :  आयसीसी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बदल करण्याची तयारी करत आहे. आयसीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार

  • Written By: Last Updated:

New Rules In Cricket :  आयसीसी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बदल करण्याची तयारी करत आहे. आयसीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2 जुलैपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (ICC) काही नवीन नियम लागू होणार आहे. ज्यामध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये 35 व्या ओव्हरपासून फक्त एकच बॉल वापरण्याचा नियम देखील समाविष्ट असणार आहे. याच बरोबर 2 जूलैपासून कसोटी क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक (Stop Clock) नियम देखील लागू करणार असल्याची माहिती आयसीसीकडून देण्यात आली आहे. तसेच नवीन नियमानुसार जर एखादा कॅच स्पष्ट नसेल तरीही देखील खेळाडू फलंदाज आऊट असल्याचा दावा करत असेल तर तो बॉल नो बॉल म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती आयसीसीकडून देण्यात आली आहे.

कसोटीमध्ये लागू होणार स्टॉप क्लॉक नियम

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार आता कसोटी क्रिकेटमध्ये देखील स्टॉप क्लॉक नियम लागू करण्यात येणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याने आता हा नियम लागू करण्यात येणार आहे. ज्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला मागील ओव्हर संपल्यानंतर एका मिनिटामध्ये नवीन ओव्हर सुरु करावी लागणार आहे. जर असं झालं नाहीतर अंपायर गोलंदाजी करणाऱ्या संघाला दोन वेळा वॉर्निंग देणार मात्र तरी देखील असं होत असेल तर अंपायर संघाला पाच धावांचा दंड देऊ शकतो. 80 ओव्हरनंतर वॉर्निंग पुन्हा एकदा रीसेट करण्यात येणार आहे. आयसीसीचा नवीन नियम 2025-27 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठीच लागू असणार असल्याची माहिती आयसीसीकडून देण्यात आली आहे. एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांसाठी आयसीसीने स्टॉप क्लॉक नियम गेल्या वर्षी लागू केला होता.

 शॉर्ट रन्सवर मोठा दंड

2 जुलैपासून शॉर्ट रन्सबाबत देखील नियम बदलणार आहे. यापूर्वी जर फलंदाजाने जाणूनबुजून शॉर्ट रन घेतले तर अंपायर संघाचे पाच धावा कमी करत होते मात्र आता नवीन नियमांनुसार जर फलंदाजाने जाणूनबुजून शॉर्ट रन घेतले तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अंपायर विचारणार तुम्हाला कोणता फलंदाज स्ट्राईकवर हवे आहे. तसेच संघाचे पाच धावा देखील कमी करण्यात येणार आहे.

लाळ लावल्यास चेंडू बदलला जाणार नाही

कोरोना काळानंतर आयसीसीने बॉलवर लाळ लावण्याल बंदी घातली होती मात्र आता यात मोठा बदल आयसीसी करणार आहे. नवीन नियमानुसार आता अंपायरला बॉलवर लाळ आढळली तर तो लगेच बदलला जाणार नाही. हा बदल संघांनी चेंडू बदलण्यासाठी जाणूनबुजून लाळ वापरु नये म्हणून करण्यात आला आहे.

डीआरएस प्रोटोकॉलमध्ये बदल

आयसीसी आता डीआरएसच्या प्रोटोकॉलमध्ये देखील बदल करण्याची तयारी करत आहे. जुन्या नियमानुसार, जर एखाद्या फलंदाजाला कॅच आउट दिल्यानंतर तो रिव्ह्यू मागतो आणि अल्ट्रा एजमध्ये बॉल बॅटला स्पर्श न करता पॅडवर आदळला कॅच आउट नाकारल्यानंतर टिव्ही अंपायर दुसऱ्या डिसमिसल मोडची तपासणी करताता जसे एलबीडब्लू. पूर्वी जर कॅच आउट झाला नसेल तर एलबीडब्ल्यूसाठी डीफॉल्ट निर्णय “नॉट आउट” होता. परंतु नवीन नियमात, जेव्हा एलबीडब्ल्यूसाठी बॉल-ट्रॅकिंग ग्राफिक दाखवले जाईल आणि जर फलंदाज येथे आउट आढळला तर त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागेल.

आम्हाला मालक बनता येणार नाही, आमदार लोणीकरांना समज देणार; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले 

35 व्या षटकानंतर एकच बॉल

आयसीसीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 35 व्या ओव्हरनंतर फक्त एकच बॉल वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे डेथ ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाजाना मदत होणार आहे. तसेच बॉन्ड्रीवरील कॅचसाठी देखील नियम बदल्यात आले आहे.

follow us