Ajit Pawar Says Dive Ghat will be made 21 meters wide : आषाढी एकादशीचा पालखी सोहळा व्यवस्थित पार पडावा, यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा 2025 हा लवकरच (Dive Ghat) सुरू होत आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) महत्वाची माहिती दिली आहे. दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्ताने देहू आणि आळंदीवरून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाते. ही पालखी पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यामधून जाते. तर या संदर्भात राज्याचे प्रमुख म्हणून स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक (Ashadhi Ekadashi) घेतली आहे. चिफ सेक्रेटरी, विभागीय आयुक्त आणि पालकमंत्र्यांनी देखील बैठक घेतली आहे.
यंत्रणेवर जबाबदारी
विभागीय आयु्क्त एका पालखीमार्गाने सोलापूर पर्यंत गेले अन् दुसऱ्या पालखी मार्गाने परत पुण्यापर्यंत आले. त्यांनी देखील यासंदर्भात आढावा घेतलेला आहे. वेगवेगळ्या मानाच्या पालख्या आहेत. त्यांची देखील बैठक मागे पार पडलेली आहे. या सगळ्यांच्या सूचनांचा आदर प्रशासनाने केलेला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात यंत्रणेवर जबाबदारी टाकलेली आहे. त्यांनी यासाठी लागणारा निधी देखील उपलब्ध करून दिला आहे.
दिवाळीनंतर उडणार राजकीय धुराळा! निवडणूक तयारीचा मुहू्र्त ठरला
दिवे घाट रूंदी वाढवणार
आता पाऊस दरवर्षापेक्षा जास्त पडला आहे. जेव्हा पाऊस चांगला पडतो, तेव्हा आमचा वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर येतोच. परंतु आमचा शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर येतो. त्यांच्या पेरण्या वैगेरे उरकलेल्या असतात, त्यामुळे त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काल दिवे घाटात पाऊस पडला, पाणी साचलंय. साईट गटारात साचलेलं पाणी रस्त्यावर आलंय. तर त्यामध्ये आम्ही गंभीरपणे या गोष्टी घेतल्या आहेत. दिवे घाटात काम चाललं आहे. दिवे घाट सात मीटर रूंदीचा आहे, आता तो 21 मीटर रूंदीचा आपण करत आहे. यावर्षी काम पूर्ण होणार नाही. पण यावर्षी वारकऱ्यांना दिवे घाट चढताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, वाहनांना अडचण होणार नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
धो-धो पावसाचा इशारा! रायगड-रत्नागिरी धोक्याच्या झोनमध्ये, घाटमाथ्यासाठी पुढील 48 तास महत्वाचे
पीटीपी अॅपचं उद्घाटन
घाटावर लोकं बसून बघत असतात, तिथून दगड कोसळू नये. कारण तो जास्त कठीण खडक नाही. अनाधिकृत बोर्ड आणि तिथे जी खबरदारी घेणे आवश्यक आहे, ती घेतली जाईल. व्यवस्थित चर्चा करून अडीअडचणी दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटाची मेट्रो पुण्यातून जात आहे. त्यामुळे टाटावर जबाबदारी टाकली आहे, असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. पालखी शहरात येईपर्यंत जर टाटाने आपली जबाबदारी उरकली नाही, अडथळे आले तर त्यांना दहा कोटीची नोटीस देण्यात येणार आहे. आम्ही पीटीपी अॅपचं देखील उद्घाटन केलं आहे. पुणे सिटी ट्राफिक पोलीस, असं या अॅपचं नाव आहे.
वारकरी निधीचं काय?
अहमदाबाद मधील सर्व वरिष्ठ यांनी आपला पाहणी केली आहे. या प्रकरणी पंतप्रधान गृहमंत्री यावर लक्ष ठेवून आहे. खरी वस्तूस्थिती लोकांच्या समोर ठेवावी माझी कळकळीची विनंती आहे. वारकऱ्यांना वीस हजार निधी एकनाथ शिंदे यांनी दिला होता. या वेळेस सगळ्यांची लिस्ट बनवली आहे. सर्वांना मान आणि निधी योग्य तो मिळेल, असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर काही पेशंट पाहिला मिळाले राज्यात आहेत. पुण्यात पिंपरीत आहेत, रुग्ण सगळे कंट्रोलमध्ये आहे. आरोग्य मंत्री यावर लक्ष ठेवले आहेत. पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये काय करायला हवं, याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, ज्यांची वये जास्त आहे त्यांनी काळजी घ्यायची गरज आहे. गर्दी टाळायची गरज आहे. खोकला, शिंक आल्यास रुमाल वापरण्याची गरज आहे, याची काळजी घेतली पाहिजे असं देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे.