Mahadev Jankar Exclusive : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा जोराने सुरु आहे. महादेव जानकर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी इंडिया आघाडीसबोत (India Alliance) जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर दुसरीकडे आज महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आज दिल्लीत 300वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) यांची जयंती साजरी केली. यावेळी त्यांनी लेट्सअप मराठीशी (letsupp Marathi) संवाद साधला. लेट्सअप मराठीला दिलेल्या या मुलाखतीमध्ये त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीची साथ सोडली असल्याची माहिती दिली आहे.
यावेळी महादेव जानकर म्हणाले की, राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो आणि मित्र देखील नसतो. माझा आणि मोदी साहेबांचा काही वाद नाही पण मोदी साहेबांचा पक्ष भाजपला रासपची गरज नसल्याने आम्ही महायुतीमधून बाहेर पडलो. त्यांनी आम्हाला विधानसभेत जागा दिलेल्या नव्हत्या तेव्हाच आम्ही आमचा निर्णय घेतला होता. आम्ही विधानसभेच्या वेळेस महायुतीमधून अधिकृत बाहेर पडलो. असं महादेव जानकर यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
तसेच लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान माझा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये शेवटचा संवाद झाला होता असं देखील महादेव जानकर म्हणाले. परभणीमधून भाजपने मला खासदार केला नाही त्यामुळे मी भाजपवर नाराज नाही. ते त्यांच्या पक्षाचा अजेंडा. आम्ही सन्मानाने जगणारी माणसे आहे. आमच्यात ताकद आहे आम्ही पुन्हा प्रयत्न करु. राजकारणात पळजळ होत असते. मी पहिली लोकसभा नांदेडला लढवली नंतर सांगलीला लढवली, बारामतीला लढवली आणि आता परभणी लढवली पण माझा पक्ष वाढत चाललाय. मी जरी मेनबत्ती म्हणून जळत असेल तर माझा पक्षा वाढत चाललेलं आहे. असं या मुलाखतीमध्ये महादेव जानकर म्हणाले.
आता खूप होतयं, कोकाटेंचा निर्णय घ्याच; रोहित पवारांची दादा अन् फडणवीसांकडे थेट मागणी
तर दुसरीकडे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, रासप इंडिया आघाडीसोबत आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूका लढवण्याची तयारी करत आहे. यासाठी पुढील काही दिवसांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महादेव जानकर यांच्या एक बैठक होणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.