आता खूप होतयं, कोकाटेंचा निर्णय घ्याच; रोहित पवारांची दादा अन् फडणवीसांकडे थेट मागणी

Rohit Pawar On Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटो (Manikrao Kokate) पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन चर्चेत आले आहे. काही दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर (Sinnar) तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? आता ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. तर आता पुन्हा एकदा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने विरोधकांना टीकेची संधी दिली आहे.
संभाजीनगरमध्ये अ. भा. बळीराजा संघटना भारततर्फे एमजीएमच्या आर्यभट्ट सभागृहात शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार समारंभात बोलताना माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खाते दिले आहे. मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहेत. अजित पवार यांनी मला हे कृषी खाते जाणीवपूर्वक दिले आहे. असं या कार्यक्रमात बोलताना माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधक माणिकराव कोकाटे यांच्यासह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषिमंत्री माणिराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे.
कृषि विभागात सध्या काम कमी आणि केवळ बडबड जास्त असा प्रकार सुरुय.
‘‘कृषि खातं ही ओसाड गावची पाटीलकी आहे,’’ असं या खात्याचे खुद्द मंत्री माणिकराव कोकाटे हेच म्हणत असतील तर इच्छा नसताना त्यांनी ही फुकटची पाटीलकी करु नये… सरकारनेही त्यांना मंत्रीपदावरून दूर करून माणुसकी आणि…— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 31, 2025
तर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच कृषि विभागात सध्या काम कमी आणि केवळ बडबड जास्त असा प्रकार सुरु आहे अशी टीका रोहित पवार यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर केली आहे.
Ghaziabad Blast : मोठी बातमी! गाझियाबादमध्ये स्फोट, एकाचा मृत्यू
कृषि विभागात सध्या काम कमी आणि केवळ बडबड जास्त असा प्रकार सुरुय. ‘‘कृषि खातं ही ओसाड गावची पाटीलकी आहे,’’ असं या खात्याचे खुद्द मंत्री माणिकराव कोकाटे हेच म्हणत असतील तर इच्छा नसताना त्यांनी ही फुकटची पाटीलकी करु नये… सरकारनेही त्यांना मंत्रीपदावरून दूर करून माणुसकी आणि संवेदनेचे धडे आधी द्यावेत. कृषि मंत्रीपदाच्या माध्यमातून जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यासाठी सेवा करण्याची संधी कार्यक्षम आणि संवेदनशील व्यक्तीकडं सोपवावी. यामुळं किमान शेतकऱ्याला न्याय तरी मिळेल! मा. मुख्यमंत्री आणि मा. अजितदादांनी यावर निर्णय घ्यावा! असं आमदार रोहित पवार यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.