मुंबई : एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डाव फिरवल्याचे दिसून येत आहे. मुंबईत आज (12 जून) सकाळी ताज लँड या हॉटेलात या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, मनसे आणि ठाकरे यांच्यातील युती होण्याच्याक्षणी फडणवीसांच्या एन्ट्रीने ट्विस्ट आला असून, टायमिंग साधत फडणवीसांनी चाणक्य निती वापरत राज ठाकरेंना (Raj Thackeray) मोहरा बनवत उद्धव ठाकरेंचा गेम केल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. (CM Devendra Fadnavis Meets Raj Thackeray)
पाटणकरांचा भाजप प्रवेश देसाईंच्या जिव्हारी; ‘भात्यात’ बाणांची जमवाजमव करत घेतले फडणवीसांचे नाव
ठाकरेंनी सांगितलं होतं संकेत नाही बातमीच देतो
मध्यंतरी उद्धव ठाकरेंना मनसे आणि ठाकरे गटात युती होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ठाकरेंनी संकेत काय बातमीच देतो असे म्हणत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असे ठणकावून सांगितले होते. त्यांच्या या उत्तराने मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. मात्र, युती होण्याच्या अंतिमक्षणी फडणवीसांनी चक्र फिरवतं राजकीय चक्रं फिरवून शिवसेना-मनसे युतीला (MNS Shivsena UBT Yuti) ब्रेक लावला जाण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. तर, दुसरीकडे ठाकरेंसोबतचं युतीचं पिल्लू सोडून उद्धव ठाकरेंना फक्त झुलवत ठेवलं आणि डाव फडणवीसांनी साधल्याचे दिसून येत आहे.
भेट न होण्याचे कोणतेही अर्थ काढू नका; महाराष्ट्र सैनिकांना पत्र लिहून राज ठाकरे कुठं निघाले?
मनसेसोबतच्या युतीमागे मोठं राजकारण
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मनसेला सोबत घेण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले आहेत. यापूर्वीही अनेकदा राज ठाकरेंसोबत फडणवीस, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी भेट घेतली होती. मुंबई महानगरपालिकेती निवडणुकीपूर्वी उद्धव आणि राज एकत्र येणार आणि राजकारणात मोठे उलटफेर होणार, अशी चर्चा रंगली होती. मराठी, मराठी माणूस हा मनसे आणि ठाकरे सेनेचा अजेंडा आहे. CM Devendra Fadnavis Meets Raj Thackeray
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत हिंदी भाषिक, गुजराती, मासांहार हे मुद्दे वरचेवर वादाचे ठरत आहेत. त्यामुळे मराठी माणसावर परप्रांतियांची मुजोरी सातत्याने वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा स्थानिक मराठी माणसांना नक्कीच सुखावणारी होती. येत्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही युती सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखीच ठरणार होती. हा फटका भविष्यातील राजकारणाची दिशा बदलणारा ठरू शकतो अशी भीती भाजपसह महायुतीतील अन्य पक्षांना आहे. त्यामुळे राज ठाकरेंचं मन आणि मतपरिवर्तन करण्यासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, फडणवीसांची ही भेट त्याचाच एक भाग अससल्याचे बोलले जात आहे.
आठ दिवसांत कळेल उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण राहतय; मंत्री गिरीश महाजन असं का म्हणाले?
फडणवीसांना राज ठाकरेंच्या ताकदीची पूर्ण कल्पना
राजकाराणात टायमिंग साधण्याची आणि ते फिरवण्याचा हातखंडा फडणवीसांकडे आहे. हे यापूर्वी अनेकदा दिसून आलेले आहे. त्यात राज ठाकरेंची ताकद काय आहे याची पूर्ण कल्पना फडणवीसांसह अन्य नेत्यांना आहे. त्यामुळे राज यांना सोबत घेण्यातच महायुती आणि भाजपचा फायदा असल्याची जाण प्रमुख नेत्यांना आहे. आजच्या भेटीत फडणवीसांनी राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे? उद्धव ठाकरेंसोबत जाण्याबाबत त्यांच्या मनात काय शिजतयं हे सर्व नक्कीच जाणून घेतलं असेल यात काही शंका नाही.
मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिंदेंचा मास्टरप्लॅन! मोठा डाव टाकला, स्वत:चं उतरले मैदानात
फडणवीस मुरलेले मात्तबर
एकीकडे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ताज लँड हॉटेलातील भेटीमुळे राजकीय वातावरण तापलेले असून, अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र, यापूर्वी फडणवीस असो, शिंदे असो किंवा सामंतांसोबतची राज ठाकरेंनी भेट असो. या सर्व भेटींनंतर या नेत्यांसह फडणवीसांनी आम्ही राज्यातील गंभीर प्रश्नांवर चर्चा केल्याचे सांगितले होते. त्यामुळे जरी ताज लँडमध्ये फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी युतीबाबत चर्चा जरी झालेली असली तरी, फडणवीस हे राजकारणातील धुरंधर आणि चाणाक्ष्य राजकारणी आहेत. त्यामुळे जरी या दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला तरी, मुळ भेटीला बगल देत फडणवीस वेगळचं उत्तर देत वेळ मारून नेतील असे मत अनेक राजकीय जाणाकार व्यक्त करत आहे. राज ठाकरे यांचे महायुतीच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचं उत्तम नात आहे. दोन्ही नेते अनेकदा शिवतीर्थवर येत असतात. त्यामुळे आजची भेट झाली, तर उद्धव ठाकरे गट त्यावर काय भूमिका घेते यावर पुढची गणित अवलंबून आहेत.