भेट न होण्याचे कोणतेही अर्थ काढू नका; महाराष्ट्र सैनिकांना पत्र लिहून राज ठाकरे कुठं निघाले?

Raj Thackeray on Birthday Post : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा येत्या (14 जून) रोजी ५८ वा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागते. परंतु, यावर्षी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वाढदिवसाच्या अगोदरच आपण मुंबईत नसल्याचं सांगितलं आहे. तसंच, काय कारण आहे याबद्दलही काही खुलासा केलेला नाही. त्यामुळं राजकारणात वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे.
बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळेच रेल्वे कोलमडली; मुंब्रा रेल्वे अपघातानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
पत्रात काय म्हणाले राज ठाकरे?
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांनो आणि हितचिंतकांनो,
सस्नेह जय महाराष्ट्र !
दिनांक :- १२ जून २०१५,
येत्या १४ जून २०१५ ला म्हणजे अर्थातच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली भेट होणं शक्य नाही, कारण या दिवशी मी सहकुटुंब मुंबई बाहेर जात आहे. तुमच्या आणि किंवा इतरांच्या मनात हा प्रश्न येईल की मी वाढदिवस साजरा का करणार नाहीये ? काही विशेष कारण आहे का? इत्यादी. पण मनापासून सांगतोय की बरतर असं कोणतंच कारण नाहीये. त्यामुळे येत्या १४ जूनला तुम्हाला भेटता येणार नाही, याचे कोणतेही अर्थ काढू नका.
गेली अनेक दशकं माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सगळे जणं येता, तुमच्याशी त्या दिवशी बोलणं होत नाही पण तुमचं दर्शन, तुमच्या अनेकांशी होणारी भेट हि ऊर्जा देणारी असते. मी आयुष्यात सर्वात जास्त काही कमावलं असेल तर तुम्हा सर्वांच अफाट प्रेम ! आणि या प्रेमाबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी आहे आणि पुढे देखील राहीन. या वाढदिवसाला तुमची भेट होणार नाही, यामुळे त्याची मला रूबरूष लागेलच !
पण लवकरच मी तुमच्या भेटीला येईन. महाराष्ट्र सैनिकांना भेटायला, त्यांचं दर्शन घ्यायला म्हणून मी येईन तेव्हा आपली भेट होईलच. बाकी तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील याबद्दल तिळमात्र शंका माझ्या मनात नाही.
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही तुमच्या भाभात काही लोकोपयोगी कार्यक्रम राबवलेत तरी माझा वाढदिवस तुम्ही साजरा केलात असं मी मानेन.
त्यामुळे या वर्षी शिवतीर्थावर येऊ नका, आपण लवकर भेटू.
महाराष्ट्राची, मराठी माणसाची तसेच तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी घ्या.
आपला नम्र,
राज ठाकरे
असं आपल्या पत्रात राज ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान, गेली अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि बंधू शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा आहे. त्यावर दोन्हीही बाजूने सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याचबरोबर दोन्ही बाजुचे प्रमुख नेतेही यावर बोलले आहेत. त्यामुळे राज-उद्धव एकत्र येणार ही चर्चा जोरदार रंगली आहे. दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे कुटुंबासह बाहेर असल्याने ते आल्यावर पुढील चर्चा होईल असं बोललं गेलं. आता उद्धव ठाकरे परतलेले असताना अचानक राज ठाकरे बाहेर जात असल्याची बातमी समोर आल्याने राजकारणात उलट-सुलट चर्चेला उधाण आलं आहे.
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांनो आणि हितचिंतकांनो,
सस्नेह जय महाराष्ट्र ! pic.twitter.com/tNKyuHkCgm— Raj Thackeray (@RajThackeray) June 11, 2025