Download App

नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; ट्रक कारला धडकल्याने चौघांचा जागीच मृत्यू

Ahmednagar Car-Truck Accident : अहमदनगरमधील संगमनेरच्या चंदनापुरी भागात नाशिक-पुणे महामार्गावर मोठा अपघात (Ahmednagar Car-Truck Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चंदनापुरी घाटात नाशिककडे जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकने कारला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

‘बेवडा, पिऊन तुझ्या किडन्या किडल्यात त्या सांभाळ’; एकेरी उल्लेख करत भुजबळांचा हल्लाबोल

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात रात्री आठच्या सुमारास मालवाहतूक ट्रक नाशिककडे जात होता. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या कारला ट्रकने जोराची धडक दिली आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात घडल्यानंतर ट्रकचालक पसार झाल्याचं समजतंय. अपघातात मृत झालेल्यांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि लहान मुलाचा समावेश आहे.

‘आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार’; अंधारेंनी पिक्चर दाखवताच महाजनांची रिअ‍ॅक्शन

या अपघातात एक महिला जखमी झाली असून या अपघातानंतर काही काळ वाहतूक सेवा ठप्प झाली होती. अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेनंतर पोलिसांनी ट्रकचालकाचा तपास केला मात्र, ट्रकचालक पसार झाल्याचं समोर आलं आहे, तर अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलनाचं पुढं काय? आज आंतरवाली सराटीत निर्णायक बैठक

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आता नाशिक – पुणे महामार्गावर सर्व वाहतूक सुरळीत करण्यात आली असून अपघात कोणत्या कारणास्तव किंवा कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या महिलेककडून जबाब घेण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे.

Tags

follow us