Murshidabad Violence : केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत (Lok Sabha) आणि राज्यसभेत (Rajya Sabha) वक्फ विधेयक मंजूर केल्यानंतर या विधेयकला राष्ट्रपतींनी मंजूरी दिलेल्यानंतर देशात वक्फ सुधारणा कायदा (Waqf Act 2025) लागू करण्यात आला आहे मात्र आता या कायद्याविरोधात देशातील अनेक राज्यात आंदोलने होताना दिसत आहे.
शुक्रवार 12 एप्रिल रोजी पश्चिम बंगालमध्ये देखीय या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळाला असून मुर्शिराबाद जिल्ह्यात (Murshidabad Violence) झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 110 जणांना अटक केली आहे.
आतापर्यंत 110 जणांना अटक
मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी 110 जणांना अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी मालदा, मुर्शिदाबाद, दक्षिण 24 परगणा आणि हुगळी जिल्ह्यांमध्ये वक्फ कायद्यावरून हिंसाचार उसळला आणि पोलिस व्हॅनसह अनेक वाहनांना आग लावण्यात आली, सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यात आली आणि रस्ते अडवण्यात आले. अशी पोलिसांनी माहिती दिली आहे. दगडफेकीत 15 पेक्षा जास्त पोलीस आणि अनेक लोक जखमी झाले आहे.
बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होणार नाही
तर दुसरीकडे वक्फ कायद्यावरुन बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर राज्यात वक्फ कायदा लागू होणार नसल्याची माहिती मुंख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दिली आहे तसेच लोकांना शांतता राखण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. आम्ही वक्फ कायद्याच्या बाजूने नाही. पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होणार नाही असं त्यांनी म्हटले आहे.
13 एप्रिल रोजी आकाशात दिसणार ‘गुलाबी चंद्र’; जाणून घ्या कुठे आणि कसा पाहता येणार?
तसेच मुख्यमंत्री ममता यांनी लोकांना आवाहन करताना म्हटले की, सर्व धर्माच्या लोकांना माझे नम्र आवाहन आहे की कृपया शांत आणि संयमी राहा. धर्माच्या नावाखाली कोणतेही चुकीचे कृत्य करू नका. प्रत्येक व्यक्तीचे जीवन मौल्यवान आहे, राजकारणासाठी दंगली भडकावू नका. जे लोक दंगली भडकावत आहेत ते समाजाचे नुकसान करत आहेत.