Navid Mushrif elected as Chairman Of Gokul Dudh Sangh : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या (Gokul Dudh Sangh) अध्यक्षपदाची निवड अखेर पार पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ (Navid Mushrif) यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. कोल्हापुरमध्ये (Kolhapur) कॉंग्रेसच्या सतेज पाटील (Satej Patil) यांना मोठा धक्का बसला आहे.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचं धक्कातंत्र पाहायला मिळालं आहे. नविद मुश्रीफांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय, तर सतेज पाटील बॅकफूटवर गेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात गोकुळ दूध संघ अतिशय प्रतिष्ठेचा (Maharashtra Politics) मानला जातो. तो कोल्हापूरच्या राजकारणावर प्रभाव टाकतो. अध्यक्षपदाच्या नावासाठी महायुतीने खेळलेल्या डावात काँग्रेसच्या सतेज पाटलांना मोठा धक्का बसला आहे.
‘सर्किट’ ची शेअर मार्केटमधून सुट्टी, भला मोठा दंड ठोकत SEBI ची अभिनेता अर्शद वारसीवर कारवाई
काही वर्षापूर्वीच सतेज पाटलांनी गोकुळमधील महाडिकांच्या सत्तेला सुरुंग लावला होता. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांनी सतेज पाटलांना धोबीपछाड मिळाल्याचं दिसत आहे.
मागील काही वर्षांपासून गोकुळवर सत्तेचा ताबा मिळवण्यासाठी जे नाट्य सुरू होतं, अखेर आज ते संपलं आहे. नविद मुश्रीफगोकुळचे अध्यक्ष झाल्यामुळे आता मुश्रीफ कुटुंबाकडे कोल्हापूरमधील एक महत्त्वाची संस्था आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये हस्तक्षेप केल्याचं बोललं जातंय.
कोल्हापूरच्या सत्ता केंद्रांच्या चाव्या मुश्रीफांच्या घरात आल्याचं बोललं जातंय. कारण कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळ अध्यक्षपद हे मुश्रीफ बाप-लेकांकडे आले आहे. त्यामुळे त्यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील कमांज वाढली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करत गोकुळ दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आज गुरुवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनामध्ये अडीच तास बैठक झाल्याचं समजतंय. या बैठकीत नेत्यांनी चर्चा करत बंद लिफाफ्यातून ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे ते नाव सुपूर्द केले होते. आज तो लिफाफा खोलण्यात आला असून नविद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. ते परदेशात असल्याने त्यांना तातडीने कोल्हापुरात बोलवण्यात आलं होतं. त्यामुळे चर्चा अधिकच रंगली होती.