Government Schemes : दिव्यांग वैवाहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा मिळणार?

Government Schemes : दिव्यांग वैवाहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा मिळणार?

Government Schemes : महाराष्ट्र (Maharashtra)सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य (समाजकल्याण) विभागाने वैवाहिक प्रोत्साहन योजना (Disability Marriage Promotion Scheme)सुरु केली आहे. राज्यातील सर्वसमावेशक विवाहांना प्रोत्साहन देण्याचा एक प्रयत्न आहे. या योजनेंतर्गत, दिव्यांग(disabled) नसलेल्या व्यक्तींशी विवाह करणाऱ्या पात्र व्यक्तींना (PwD) 50 हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक प्रोत्साहन दिले जाते. सशक्त आणि सर्वसमावेशक कुटूंबं तयार करण्यासाठी ही योजना राबवली जाते.

मी 20-20 खेळू शकतो, गोऱ्हेंनी फार न्याय दिला नाही; निलंबन मागे घेताच ठाकरेंच्या वाघाची ‘डरकाळी’

योजनेचे फायदे काय?
या योजनेंतर्गत पात्र जोडप्यांना आर्थिक मदतीचे सर्वसमावेशक पॅकेज दिले जाते. यामध्ये बचत प्रमाणपत्र : जोडप्यांना 25 हजार रुपये किंमतीचे बचत प्रमाणपत्र मिळू शकते. हे प्रमाणपत्र त्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी फायदेशीर ठरु शकते.
रोख मदत : पात्र जोडप्याला 20 हजार रुपयांची रक्कम रोख स्वरूपात दिली जाते. त्याचा उपयोग विवाह किंवा त्यांच्या भविष्यातील योजनांशी संबंधित विविध कारणांसाठी केला जाऊ शकतो.
घरगुती उपयोगिता मदत : योजनेंतर्गत 4,500 रुपये घरगुती उपयोगिता सहाय्याच्या रुपात दिले जाते. हे नवविवाहित जोडप्याला त्यांचे घर आवश्यक वस्तूंसह सेट करण्यास मदत करते.
विवाह प्रोत्साहन कार्यक्रम : योजनेत सहभागी होण्यासाठी आणि माहिती आणि समर्थन देण्यासाठी, जोडप्यांना विवाह प्रोत्साहन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 500 रुपये मंजूर केले जातात.

धनुभाऊ तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचय…सकल मराठा समाजाचा कृषीमंत्री मुंडेंना थेट इशारा

योजनेसाठी पात्रता निकष काय?
वैवाहिक प्रोत्साहन योजनेचे लाभ घेण्यासाठी
– अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
– अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
– अर्जदार दिव्यांग व्यक्ती (PwD) असावा. दिव्यांगामध्ये दृष्टीदोष, कमी दृष्टी, श्रवणदोष, ऑर्थोपेडिक दिव्यांगत्व आदींचा समावेश असू शकतो.
दिव्यांगत्व 40 टक्के किंवा त्याहून अधिक असावे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी दिव्यांग नसलेल्या व्यक्तीशी विवाह केलेला असावा.

योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी कराल?
– या योजनेंचा फायदा घेण्यासाठी पात्र लाभार्थ्याला ऑफलाइन अर्ज करणे गरजेचे आहे.
– अर्ज करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाला भेट देऊन अर्जाचा फॉर्म घ्यावा.
– अर्जात विचारलेली माहिती सविस्तरपणे भरावी.
– पासपोर्ट आकाराचे (स्वाक्षरी केलेले) फोटो जोडावे.
– आवश्यक ती सर्व कागदपत्रे स्वयं-साक्षांकित प्रती जोडाव्या लागणार आहेत.
– आवश्यक कागदपत्रांसह रीतसर भरलेला आणि स्वाक्षरी केलेला अर्ज जिल्हा समाज कल्याण कार्यालयात सबमिट करावा.
– यानंतर जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडून तुमचा अर्ज सबमिट केल्याची पावती किंवा पोचपावती देखील घ्यावी.

आवश्यक कागदपत्रं कोणती?
– आधार कार्ड
– दोन पासपोर्ट-आकाराचे फोटो (स्वाक्षरी केलेले)
– महाराष्ट्र राज्याचे निवासी प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र
दिव्यांगत्व प्रमाणपत्र
– बँक खात्याचे तपशील (बँकेचे नाव, शाखेचे नाव, पत्ता, IFSC,आदी)
– वयाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र, इयत्ता 10वी/12वीची मार्कशीट आदी)
– विवाहाचा पुरावा
– जिल्हा समाज कल्याण कार्यालयाने मागवलेले इतर कोणतेही दस्तऐवज

या ठिकाणी संपर्क साधा
अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण कार्यालयाला भेट द्यावी.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज