‘त्या’ पदासाठी राष्ट्रवादीत अर्धा डझन लोक तयार; जयंत पाटलांच्या वक्तव्यावर भुजबळ बोलले

‘त्या’ पदासाठी राष्ट्रवादीत अर्धा डझन लोक तयार; जयंत पाटलांच्या वक्तव्यावर भुजबळ बोलले

Chagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतल्यानंतर आता पक्षातील कार्याध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचा कार्याध्यक्ष कोण असणार असा प्रश्न आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मी स्वतः कार्याध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भुजबळ म्हणाले, पाटील यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही. पण कार्याध्यक्षपद निर्माण करणार आहेत की नाही इथून सगळा मुद्दा आहे. जर निर्माण करणार असतील तर नेमण्याची काय पद्धत राहिल. दुसरा मुद्दा मग निवडायचे झाले तर राष्ट्रवादीत अर्धा डझन तरी असे लोक आहेत जे या पदाची जबाबदारी सांभाळू शकतात. त्यात जयंत पाटीलही आहेत. मात्र आज आमच्यासमोर हा मुद्दा नाही.

मोठी कारवाई! पुण्यात तीन कोटीहून अधिकची रोकड जप्त

काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी भाजपाचा प्लॅन बी सुरू असल्याचा आरोप केला होता. त्यावर भुजबळ म्हणाले, तीन पक्ष वेगळ्या विचारधारेचे आल्यावर थोडे घर्षण होणार, नेत्यांनी काही बोलले तर विस्कळीतपणा येणार मात्र ते होता कामा नये.

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या काळात सरकार गेलं. मला वाटतं की चव्हणांनी अंतर्मनात शोध घ्यावा असं कसं झालं. आपणच मुख्यमंत्री असताना हे कसं झालं. याचा विचार करावा. अशी वक्तव्ये पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यावी. जोपर्यंत सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्रित आहेत तोपर्यंत कोण काय बोलतंय याकडे लक्ष देण्याची गरज नाही. इतर नेत्यांनीही काही वक्तव्ये करून मिठाचे खडे टाकू नयेत.

केरला स्टोरी चित्रपटाच्या वादावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, मी केरला स्टोरी चित्रपट अजून पाहिलेला नाही. धर्माधर्मात भांडणे लागतील आणि त्याचा फायदा निवडणुकीत होईल अशा ज्या कलाकृती आहेत त्या दाखवता कामा नयेत. दाखवल्या तरी लोकांनी मनावर घेता कामा नयेत.

.. तर मग सर्वांवरच कारवाई करणार का ? काँग्रेस-भाजप युतीवर वडेट्टीवारांचा सवाल

आरएसएसवर देशद्रोहाचा आरोप करू नका

आरएसएसवर संघटनेवर कुणी देशद्रोहाचा आरोप करू नये करता कामा नये. परंतु, आरएसएसमध्ये आहे असे सांगून असे जे काही धंदे करणारे लोक आहेत त्यांच्यावर आरएसएसने नजर ठेवली पाहिजे. पोलीस व इंटेलिजन्स यांनी आधिक सतर्क राहण्याची गरज आहे. राष्ट्राला धोका देणारे कोणत्याही पक्षाचे किंवा संघटनेचे असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube