Chhagan Bhujbal : उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर आज…

Chhagan Bhujbal : उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर आज…

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंवर बोलताना भुजबळ म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर आज काही प्रश्न हे वेगळ्या मार्गावर गेले असते, पण जर तरला अर्थ नसतो. सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्यापाठीमागे आहे. त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळेल असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

नाशिकमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, ठाकरे यांनी राजीनामा देण्याची घाई केली. मात्र आता जे काही झालं ते झालं आहे, यामुळे याला आता काही राहिला नाही. यावर आता कोर्ट काय निर्णय देत हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरेंना खुर्चीचा मोह नव्हता म्हणून त्यांनी राजीनामा दिला. कोर्टात काय होईल? कसे होईल हे कोर्ट पाहील. मात्र त्यांनी जो निर्णय घेतला व त्यानंतर जे काही चाललं आहे, शिवसेना आमची, पक्ष आमचा या सगळ्यांमुळे राज्यातील जनतेची सहानुभूती हे उद्धव ठाकरेंसोबत आहे. कितीही कार्यकर्ते इकडचे तिकडे गेले तरी देखील मतदार काही हालतील असे होणार नाही.

उलट मतदारांमध्ये वेगळं वारे वाहू लागले आहे. मतदारांमध्ये उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने सहानुभूतीचे वातावरण राज्यातील राजकारणात पाहायला मिळते आहे. असे म्हणत भुजबळ यांनी ठाकरेंची पाठराखण केली.

Prithvi Shaw : मुंबईत क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या गाडीवर हल्ला

आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात नसून आसाम येथे असल्याचं म्हटलं होतं यावरून भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. घेऊन जा सगळं आता तेवढंच राहिलं आहे. आपले लोक तिकडं गेले होते त्यांनी सांगितलं की काय असं म्हणत भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube