पार्टटाईम गृहमंत्र्यांमुळे गुन्हेगार मोकाट, नाना पटोलेंनी फडणवीसांना सुनावले !

  • Written By: Published:
पार्टटाईम गृहमंत्र्यांमुळे गुन्हेगार मोकाट, नाना पटोलेंनी फडणवीसांना सुनावले !

Nana Patole On Devendra Fadanvis : राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारला स्थापना होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या सरकारच्या कामगिरीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Nana Patole) यांनी जोरदारपणे घेतरले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (part-time-home-minister-nana-patole-on-devendra-fadanvis)

औरंगाबाद की छ.संभाजीनगर? : पवारांनी बसवलेला धुराळा फडणवीसांनी पुन्हा उडवला

नाना पटोले म्हणाले, हे एक वर्ष गद्दारी, राज्यातील जनतेशी केलेली बेईमानी तसेच दिल्लीच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राला १० वर्ष अधोगतीकडे घेऊन जाणारे ठरले आहे. राज्यात हे असंवैधानिक, असंवेदनशील, भ्रष्ट ‘कुराज्य’ असावे असे स्वाभिमानी जनतेला अजिबात वाटत नसून लवकरात लवकर जावे हीच जनतेची इच्छा आहे. हे सरकार स्थापन करताना घेतले गेलेले सर्व निर्णय सुप्रीम कोर्टानेच चुकीचे ठरवले आहेत. राजभवनचा गैरवापर करून, आमदारांना ईडी, सीबीआयची भिती घालून ‘खोके’ देऊन सरकार स्थापन करण्यात आले. हे सरकारच असंवैधानिक आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही ईडी सरकार खुर्चीला चिकटून बसले असल्याची टीकाही पटोले यांनी केली आहे.


सरकारवरील यथेच्छ टिकेनंतरही CM शिंदेच्या शिलेदाराने थोपटली अजितदादांची पाठ

राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून पटोले म्हणाले, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. गेल्या चार महिन्यांत २० ठिकाणी दंगली घडवून आणल्या. ईडी सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत. मुंबई हे देशात महिलांसाठी सुरक्षित शहर असा नावलौकिक होता. पण लोकलमध्ये मुलींवर अत्याचार होत आहेत, महिलांच्या हत्या वाढल्या आहेत. राज्यातील ४ हजारांपेक्षा जास्त महिला व मुली गायब झाल्या आहेत, पुण्यासारख्या शहरातही दिवसाढवळ्या मुलीवर कोयत्याने हल्ला होतो.

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही, सहा-सात विभागाचा कारभार, सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद व राजकीय साठमारीतून त्यांना गृहविभागाकडे लक्ष देता नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदारच नाही तर आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीही विरोधकांना जाहीरपणे धमकी देत आहेत. ईडी सरकारच्या काळात गुन्हेगार मोकाट व पोलीस प्रशासन सुस्त आहे. केवळ विरोधी पक्षांच्या लोकांवरच कारवाई केली जात असल्याचा आरोपही पटोेले यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube