सुषमा अंधारेंचं शरद पवारांना पत्र; ‘साहेब, तुमचा निर्णय अठरापगड जातीला….’

सुषमा अंधारेंचं शरद पवारांना पत्र; ‘साहेब, तुमचा निर्णय अठरापगड जातीला….’

Sushama Andhare On Sharad Pawar announcement : राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज निवृत्तीची घोषणा केली. लोक माझे सांगाती या पुस्ताकाच्या प्रकाश सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली. राष्ट्रवादीच्या (NCP)अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याचं शरद पवारांनी जाहीर करताच तिथे उपस्थित असलेले नेते आणि कार्यकर्ते भावनिक झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते यांनी पवारांच्या या निर्णयाला विरोध करत त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

सुषमा अंधारे यांनी शरद पवारांना पत्र लिहित आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिलं की, खरंतर मी आपल्याला लिहावे किंवा सांगावे एवढी प्रज्ञा निश्चितच माझी नाही. पण तरीही सर, मोठ्या धाडसाने हे लिहिले पाहिजे. मी आपल्या पक्षाची कधीच साधी प्राथमिक सदस्यही नव्हते. पण आपला निर्णय एकूणच फक्त पक्ष म्हणूनच नाही तर, महाराष्ट्रातील बहुजन उपेक्षित तळागाळातील अठरापगड जातीची बुज असणारा नेता म्हणून ज्यांना जाण आहे त्या कोणालाही मानवणार नाही, असं सांगितलं.

गेल्या 60 वर्षांपासून देशाच्या राजकारणात शरद पवार नावाचं घोंघावणारं वादळ आता संसदीय राजकारणात दिसणार नाही. योग्य वेळी भाकरी फिरवावी लागते, ती नाही फिरवली तर ती करपते, असं सुचकपणे शरद पवार म्हणाले होते. आज त्यांनी भाकरी फिरवण्याची सुरूवात स्वत:पासून केली. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त असल्याचं सांगत पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही, अशी घोषणा केली. त्यावर अंधारे यांनी सांगितलं की, बदल हा सृष्टीचा नियम असतो. जे काल होते, ते आज असेलच असे नाही. जे आज आहे, ते उद्या राहीलच, असे नाही. पण असे असले तरी काही गोष्टीत लोकांना बदल अजिबातच मान्य नसतो. महाराष्ट्राच्या बुजुर्ग व्यक्ती म्हणून आपला हा निर्णय अजिबातच न पटणारा आहे.

Sharad Pawar Retirement : पुस्तकांचं प्रकाशन, राजीनामा ते नेत्यांना अश्रू अनावर; आजच्या कार्यक्रमातील फोटो

अंधारे यांनी पुढं लिहिलं की, कदाचित आपल्या नंतर आपल्या पक्षाला अध्यक्ष मिळतील आणि ते खूप निष्ठेने आणि प्राणपणाने पक्ष वाढीसाठी काम करतीलही. पण सर , माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेली मुलगी असेल, मोतीराज राठोड असतील, व्यंकप्पा भोसले असतील, इचलकरंजीचे पवार असतील, निलंग्याचे विलास माने असतील ही माणसं आपण उभी केलीत. कुणी काहीही म्हटलं तरी रामदास आठवले हे नेतृत्व पहिल्यांदा आपल्या पारखी डोळ्यांनी हेरले. आपल्या पुढाकारामुळेच पहिल्यांदा आंबेडकरी चळवळीतले चार खासदार एकत्रितपणे निवडून आले.

एकीकडे ना धो महानोर यांच्यासारखे शेतीमातीशी नाळ असणारे जाणकार साहित्यिक आपल्या सभागृहात असले पाहिजे. तर दुसरीकडे तीन दगडाच्या चुलीवरचे अन्न शिजवून खाणारे आणि जन्मभर भटकंती केली तरी मेल्यावर स्मशानभूमीचा प्रश्न उरावा अशा भीषण दुर्भिक्षातून उभे राहिलेले लक्ष्मण मानेंसारखे लोकही सभागृहात असावे, हा सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग आपण केला, असं म्हणत पवारांच्या कर्तृत्वाचे कामाचे कौतूक केले.

कोणताही पक्ष किंवा संघटना चालवण्यासाठी चार गुणांची चतुसूत्री एकत्र असणे अत्यंत गरजेचे असते. एक नेतृत्व, दोन वक्तृत्व, तीन विचारधारा, चार संघटन कौशल्य. आपल्या ठायी या चारही गुणांचा संगम आहे, हे सत्य महाराष्ट्रात काय भारतातला कोणीही नाकारता येणार नाही.

शतकातला नेता म्हणूनही आपला एक वेगळा उल्लेख आहे. आपल्या निर्णयाने राष्ट्रवादी पक्षाचे काही नुकसान होत आहे का? किंवा आपल्यानंतर या पक्षाचे नेतृत्व करण्यास कुणी सक्षम आहे किंवा नाही ? या सगळ्या बाबींमध्ये जाण्याची अजिबातच इच्छा नाही. पण आपला अनुभव प्रश्न हाताळण्याचे हातोटी, कमालीचा संयम या सगळ्यांची आज गरज आहे. एकूणच महाराष्ट्र आणि देश ज्या संक्रमण काळातून जात आहे त्या संक्रमण काळात हुकूमशाही आणि दमण यंत्रणेच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राला एका ज्येष्ठ बुजुर्गाचे नुसते आशीर्वादच नाही तर मुत्सद्दी राजकारणाचा अनुभव आणि दिशादर्शक मार्गदर्शनही हवे आहे, असं त्या म्हणआल्या.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube