- Home »
- Satyajeet Tambe
Satyajeet Tambe
‘शिक्षण विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार…’; आमदार तांबेंचा खळबळजनक आरोप
Ahmednagar News : शिक्षक भरती घोटाळा परीक्षामधील पेपरफुटीची प्रकरणे (Teacher Recrutment Exam), निकालांमधील दिरंगाई अशा विविध प्रकरणांनी ग्रासलेल्या शिक्षण विभागामधील सावळ्या गोंधळावर आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी विधिमंडळात ताशेरे ओढले. एकीकडे शिक्षणमंत्री चांगलं काम करत असले, तरी शिक्षण विभाग भ्रष्टाचाराची बजबजपुरी बनला आहे, असा घणाघात करत राज्यात घडणाऱ्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांपैकी सर्वाधिक प्रकरणं शिक्षण विभागाशी […]
मुंबईतील एक अन् उर्वरित महाराष्ट्रातील शिक्षकांना वेगळा न्याय का? आमदार तांबेंचा EC ला सवाल
अहमदनगर : शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणे, ही बाब फक्त मुंबई शहर व उपनगरांपुरती मर्यादित नाही. संपूर्ण राज्यातील शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवले जात आहे. यातून राज्यभरातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण राज्यातील शिक्षकांसाठी हा आदेश देण्याची गरज आहे, अशी मागणी नाशिक पदवीधर विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet […]
‘काँग्रेसची अवस्था पाहून मनाला वेदना’; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजित तांबेंची पोस्ट
Satyajeet Tambe News : सध्या काँग्रेस पक्षाची स्थिती, अवस्था पाहून मनाला खूप वेदना होत असल्याचं म्हणत आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) भावूक झाले आहेत. राज्यात दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपला काँग्रेसच्या विधानसभा सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये मोठा भूकंपच झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसला रामराम करत […]
‘लोकशाहीचा स्तंभ वाचवा’; राहुरी दुहेरी हत्याकांड प्रकरणी सत्यजित तांबेची मागणी
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकिलांचे दुहेरी हत्याकांड घडले यावर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, राहुरी येथे वकील दांपत्याचे दुहेरी हत्याकांड घडले आहे. या घटनेमुळे राज्यातील वकील हे हादरवून गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये मध्येच न्यायव्यवस्थेची चौथा स्तंभ मानला जातो याची काळजी घेणे ही शासनाची जबाबदारी आहे असे मला वाटते असं आमदार सत्यजित तांबे […]
पेपरफुटी प्रकरणी सत्यजित तांबेंनी लक्ष वेधलं; शासनाकडे केली ‘ही’ मागणी
Ahmednagar News : राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरू असताना यावर राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे परीक्षार्थींंमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. पेपर फोडणाऱ्यांना कोणत्याही कायद्याची भीती राहिलेली नाही. वेळीच यावर ठोस कायदा केला नाही तर भविष्यात स्पर्धा परिक्षांचे पेपर फुटतं राहतील. नोकर भरती करणाऱ्या खासगी कंपन्यांवर कायद्याचा धाक असायला हवा. जेणेकरून भविष्यात […]
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सत्यजित तांबे सरसावले; शिक्षणमंत्र्यांकडे केली मागणी
Ahmednagar News : राज्यातील अनेक ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी नंदुरबारसह इतर जिल्ह्यात स्थलांतर करतात. यावेळी कामगारांचे संपूर्ण कुटुंब हे गाव सोडत असतं. त्यामुळे मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित होतो. मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी कायद्यानुसार जिल्हा परिषदेने ‘साखरशाळां’च्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडली आहेत. मात्र, अजूनही काही जिल्ह्यात साखर शाळा सुरू झालेल्या नाहीत. यावर आमदार […]