एअर इंडियाकडून मृतदेहांची अदलाबदली, तब्बल 12 चुकीचे मृतदेह ब्रिटिश कुटुंबांना सोपवले…

Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात (Air India plane crash) मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह अद्याप त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचलेले नाहीत. पाठवण्यात आलेल्या मृतदेहांपैकी १२ मृतदेहांचे अवशेष हे बदलेले पाठवण्यात आले. लंडनमधील (London) मृत कुटुंबियांचे काम पाहणाऱ्या वकिलांनी हे उघडकीस आणलं. त्यांचा दावा आहे की, लंडनमध्ये या मृतदेहांची तपासणी केली असता ते दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचं आढळून आले. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत एअर इंडियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
‘सैयारा’चा जलवा कायम; स्पॉटिफाय ग्लोबल ५० चार्टवर टॉप ७ मध्ये पोहोचणारं पहिलं बॉलिवूड गाणं
१२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले होते. त्यात क्रू मेंबर्स आणि इतरांसह २६९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ५२ ब्रिटिश नागरिकांचा समावेश होता. हा अपघात इतका भीषण होता की मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले होते. त्यानंतर डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर ते मृतदेह त्यांच्या कुटुंबांना पाठवण्यात आले. त्यानंतर लंडनमध्ये या मृतदेहांची पुन्हा तपासणी करण्यात आली. तपास अधिकारी कोरोनरने डीएनए जुळवला तेव्हा ते मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे निष्पन्न झाले. एक-दोन नव्हे तर १२ मृतदेहांसोबत हे घडले. मृतदेहांची अदलाबदल झाल्याचं तपासात उघड झाल्यानंतर अनेक कुटुंबांना अंत्यसंस्कार कार्यक्रम रद्द करावे लागले.
‘सैयारा’चा जलवा कायम; स्पॉटिफाय ग्लोबल ५० चार्टवर टॉप ७ मध्ये पोहोचणारं पहिलं बॉलिवूड गाणं
१२ मृतदेह परत पाठवले
वकील जेम्स हीली प्रॅट यांनी डेली मेलला सांगितले की, किमान १२ ब्रिटिश नागरिकांच्या मृतदेहांचे अवशेष भारतात परत पाठवण्यात आले आहेत. ते म्हणाले की, मी एका महिन्यापासून या ब्रिटिश कुटुंबांच्या घरी बसलो आहे, या लोकांना फक्त त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह परत हवे आहेत. यापैकी अनेक लोकांना अद्याप त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह मिळालेले नाहीत, काही लोकांना मृतदेहही मिळाले आहेत पण ते त्यांच्या प्रियजनांचे नाहीत. जेम्स म्हणाले की, हा एक मोठा निष्काळजीपणा आहे, याचे स्पष्टीकरण कुटुंबियांना मिळायला हवे.
दरम्यान, एअर इंडिया विमान अपघात इतका भीषण होता की मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले होते. तज्ज्ञांच्या मते, इमारतीला धडकल्यानंतर विमान आगीचा गोळा बनले, ज्याचे तापमान १५०० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. यामुळे मृतदेह पूर्णपणे जळाले होते. नंतर, सर्व मृतदेह त्यांच्या कुटुंबांना सोपवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली होती.