अहमदनगर महाकरंडक २०२४ ची प्राथमिक फेरी रंगणार आठ शहरांत

  • Written By: Published:
अहमदनगर महाकरंडक २०२४ ची प्राथमिक फेरी रंगणार आठ शहरांत

अहमदनगरः नव्या वर्षात कलाकारांना ओढ लागते ती अहमदनगर महाकरंडकची (Ahmednagar Mahakarandak). अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एन्टरटेनमेंट्स आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन प्रायोजित व श्री. महावीर प्रतिष्ठान अहमदनगरकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा स्पर्धेचे ११ वे वर्ष आहे.अहमदनगर महाकरंडक २०२४ ची प्राथमिक फेरी ही प्रमुख आठ शहरात रंगणार आहे. १ ते १० जानेवारी दरम्यान प्राथमिक फेरी होईल. तर १८ ते २१ जानेवारीला अहमदनगरमधील माऊली सभागृहात स्पर्धा होणार असल्याची माहिती शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनचे अध्यक्ष व अहमदनगर करंडकचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया(Narendra Firodia)व श्री महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाल शिंगी यांनी दिली.

या स्पर्धेचे डिजिटल पार्टनर लेट्सअप आहे. तर असोसिएशन विथ आय लव्ह नगर आहे. अहमदनगर महाकरंडक २०२४ ची प्राथमिक फेरी-कोल्हापूरला 1, 2 जानेवारी, पुणे 3, 4 जानेवारी, मुंबई-5, 6, 7 जानेवारी, नाशिक-8 जानेवारी अमरावती 9 जानेवारी, छत्रपती संभाजीनगर-9 जानेवारी, अहमदनगर-9 आणि 10 जानेवारी रोजी होणार आहे.

महाराष्ट्राची सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा!

साडेतीनशे पेक्षा जास्त एकांकिका, आठ केंद्र हजारो कलाकार, तितकेच तंत्रज्ञ, चार दिवसांचा महाउत्सव, जबरदस्त आणि सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हणजे पारितोषिक वितरण समारंभ, ही ओळख आहे . महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या एकांकिका स्पर्धेची’ अहमदनगर महाकरंडक’ रंगभूमीची रणभूमी!२०१३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली आणि अवघ्या दहा वर्षात या स्पर्धेने महाराष्ट्रातच नाही तर तर देशाच्या बाहेर सुद्धा आपला लौकिक पोहोचवला म्हणूनच, या स्पर्धेमध्ये गतवर्षी थेट अमेरिकेहून ऑनलाईन पद्धतीने एकांकिका सादर झाली. या स्पर्धेसाठी ही अत्यंत गौरवाची गोष्ट होती. पण हे सगळं घडतंय ते या स्पर्धेसाठी येणाऱ्या असंख्य कलाकारांमुळे, रसिकांमुळे, आणि अनेक मान्यवरांच्या आशीर्वादामुळे म्हणूनच अल्पावधीतच या स्पर्धेने सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःचा एक मानबिंदू निर्माण केला आहे. स्पर्धा कशी असावी? तर अहमदनगर महाकरंडक सारखी असं आज प्रत्येक जण म्हणतो ते कदाचित यामुळेच. कोणतीही गोष्ट सुरू करणे यापेक्षा ती गोष्ट सातत्याने तितक्याच दर्जेदारपणे चालू ठेवणे हे अवघड असते.

किंग खानसोबत शूटिंग करताना उपाशी राहिलेली ट्विंकल खन्ना; म्हणाली, ‘पोट सपाट दिसण्यासाठी….’

https://mahakarandak.com

आलेल्या प्रत्येक कलाकाराला सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, यासह लांबून आलेल्या कलाकारांसाठी राहण्याची व्यवस्था सुद्धा या स्पर्धेमध्ये केली जाते. या स्पर्धेने फक्त कलाकारांना त्यांचं हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं नाही तर त्याच कलाकारांना आपली स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची आणि आपल्या भविष्याला एक नवा आकार देण्याची संधी सुद्धा मिळवून दिली आहे. म्हणूनच आज अनेक कलाकार चित्रपट, मालिका आणि आणि इतर माध्यमांमध्ये जाऊ शकले त्यात या स्पर्धेचा खूप मोठा वाटा आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये एका नवीन सांस्कृतिक चळवळीला सुरुवात झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज