‘का रे दुरावा’ मालिका पुन्हा सुरू होणार? सुयश टिळकची खास पोस्ट

‘का रे दुरावा’ मालिका पुन्हा सुरू होणार? सुयश टिळकची खास पोस्ट

Suyash Tilak Post Ka re durava : 9 वर्षांपूर्वी झी मराठीवर एक का रे दुरावा ही मालिका होती. या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. मालिकेचं कथानक अत्यंत दमदार होतं. तर मालिकेतील कलाकारांची फळी देखील तेवढीच ताकदीची होती. या सगळ्या कॉम्बिनेशनमुळे ही मालिका प्रेक्षकांना अत्यंत भावली. तर या मालिकेचा दुसरा भाग देखील यावा असं आजही या मालिकेच्या प्रेक्षकांना वाटत. आज या मालिकेला सुरूवात झाली होती. त्याला 9 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त सुयश टिळकने एक खास पोस्ट केली आहे.

‘मातोश्रीवर बसून कारभार म्हणजे उंटावरुन शेळ्या हाकणं’; जोगेंद्र कवाडेंची सडकून टीका

काय आहे सुयश टिळकची खास पोस्ट?
या मालिकेबद्दल पोस्ट करताना सुयश म्हणाला की, ’18 ऑगस्ट 2014 ह्याच दिवशी काही वर्षांपूर्वी हा ‘का रे दुरावा’ चा प्रवास सुरू झाला. 2016 मध्ये मालिका संपली. पण त्या मालिकेने जोडले गेलेले प्रेक्षक आजही त्या कथेवर पात्रांवर भरभरून प्रेम करतात. भेटले की, आवर्जून आठवण सांगतात.

इंफ्लुएंसर्सच्या फुकट आर्थिक सल्ल्यांवर बसणार लगाम, ASCI कडून नवीन नियमावली जारी

पुढे सुयश म्हणाला की, आपण करत असलेल्या केलेल्या कामांची अशी पोचपावती मिळत राहते, तेव्हा नवीन उत्साह उर्जा मिळते. आज इतक्या वर्षांनी पुन्हा हे पात्र साकारले. तर नक्कीच त्यात अनुभवामुळे आलेलं शहाणपण येईल आणि आधी केलं त्यापेक्षा चांगलं काम करता येईल. त्यासाठी तुम्हा सर्वांचेच खूप आभार.’

त्याच्या पोस्टमुळे सोशल मिडीयावर या मालिकेच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. या मालिकेचा दुसरा भाग देखील यावा असं आजही या मालिकेच्या प्रेक्षकांना वाटत. त्यामुळे ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube