इतिहास केवळ पुस्तकांतच नाही तर…, सम्राट पृथ्वीराज चौहानांच्या इतिहासावर विक्रांत मॅसीने व्यक्त केल्या भावना

Vikrant Massey expressed his feelings on the history of Emperor Prithviraj Chauhan : प्रसिद्ध अभिनेता बॉलिवूड विक्रांत मॅसी यांनी अलीकडेच सोनी टीव्हीवरील आगामी मालिकेचा प्रोमो पाहून सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या इतिहासाविषयी आपली भावना प्रकट केली. इतिहास हा केवळ पुस्तकांतच साठवलेला नाही, तर तो आपल्याला आपले मुळ, आपली संस्कृती आणि संघर्षांची जाणीव करून देतो, असे मत मॅसी यांनी व्यक्त केले.
फोन पे युजर्ससाठी गुड न्युज! ‘या’ लोकांना करता येणार विना इंटरनेट पेमेंट
टेलिव्हिजन मालिकांमधून आपल्या अभिनयाची सुरुवात करणाऱ्या विक्रांत मॅसी यांनी बालिका वधू मधील भूमिकेने लोकप्रियता मिळवली. त्यानंतर त्यांनी १२वी फेल, द साबरमती रिपोर्ट अशा चित्रपटांतून प्रभावी अभिनय सादर केला. आता त्यांनी चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान या सोनी टीव्हीवरील मालिकेच्या प्रोमोनंतर आपल्या विचारांना वाचा फोडली आहे.
कोल्हापूर टस्कर’ संघ श्रींमत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या दर्शनाला
विक्रांत मॅसी म्हणाले, “काही जणांना माहित नसेल, पण इतिहास हा माझा आवडता विषय आहे. मी आजही जुन्या पुस्तकांत रमतो कारण आजचं समजून घेण्यासाठी भूतकाळाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. अलीकडे मी सोनी टीव्हीवरील या नव्या शोचा प्रोमो पाहिला आणि एक विचार मनात आला.”ते पुढे म्हणाले, “कोण म्हणतो पृथ्वीराज चौहान मोहम्मद गौरीकडून हरला? पृथ्वीराज चौहानने अनेक वेळा गौरीला युद्धात हरवले आणि दरवेळी त्याला माफ केले. मात्र एका वेळी गौरीने कपटाने विजय मिळवून पृथ्वीराजला बंदी बनवले, त्यांच्या डोळ्यांवर अन्याय केला आणि त्यांना क्रूर मृत्यू दिला.”
कुंपणच लागलं शेत खायला; बँकेतही पैसे सुरक्षित नाहीत, मॅनेजरने ग्राहकांच्या खात्यातून काढले पैसे
“पण पुस्तकांमध्ये आणि शेजारील देशांच्या इतिहासांत सांगितले जाते की पृथ्वीराज हरला. हे चुकीचं आहे. एक लढाई आणि एक घटना एखादा देश किंवा संस्कृती घडवत नाही किंवा नष्ट करत नाही. हे निर्णय शेकडो वर्षांत तयार होतात. आज, जवळपास हजार वर्षांनंतरही, पृथ्वीराज चौहान यांची भूमी – दिल्ली, अजमेर, राजपुताना – भरभराटीने उभी आहे. तर गौरीचा ‘घोर’ हा भाग आज जगातील सर्वात मागास प्रदेशांपैकी एक मानला जातो.”मॅसी शेवटी म्हणतात, “पृथ्वीराज आजही आपल्या आठवणीत आणि अभिमानात जिवंत आहेत. त्यांच्यावर आपल्याला अभिमान आहे. पण मोहम्मद गौरीचं नाव घेणारा आज त्यांच्या देशातही कोणी नाही.”