समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा; पाहा खास फोटो

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या म्हणजेच इगतपुरी ते आमणे (76 किमी) दरम्यानच्या लोकार्पणाचा सोहळा आज पार पडला.
- यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह इतर कॅबिनेट मंत्री आणि आधिकारी उपस्थित होते.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर आज अडीच वर्षांनी या महामार्गातील शेवटच्या टप्प्यात 76 किमी इगतपुरी ते आमणे या रस्त्याचे लोकार्पण झाले.
- या प्रकल्पासाठी 61 हजार कोटी रुपयांचा खर्च करुन 701 किमीचा समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत सुरू झाला आहे.
- या महामार्गासाठी तब्बल 12 कोटी सिमेंट बॅग वापरण्यात आल्या असून स्टीलही मोठ्या प्रमाणात वापरले आहे. 7 लाख मेट्रिक टन स्टीलचा उपयोग रस्ता उभारण्यासाठी करण्यात आला आहे.
- महायुतीच्या सरकारकरीता आनंदाची गोष्ट आहे. जे स्वप्न आम्ही 2014 नंतर आम्ही पाहिले होते. त्याची पूर्तता आज होत आहे. समृद्धी महामार्ग हा केवळ रस्ता नाहीये महाराष्ट्राच्या इकॉनॉमी च कॉरिडॉर आहे. असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
- हा प्रकल्प सुरु असताना अनेकांनी याला विरोध केला होता. संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये आम्हाला या प्रकल्पाला विरोध करा असं सांगितले होते. असं अजित पवार म्हणाले.
- समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्यातील रस्त्याचे लोकार्पण झाल्याने प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाचेल, इंधन बचत होईल, प्रवास वेगवान होईल. त्याचप्रमाणे औद्योगिकीकरणास चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.
- या महामार्गावर 73 पूल आहेत. वन्य जीवांना धोका पोचू नये यासाठी अंडर पास आणि ओव्हर पास बनवले आहेत.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत समृद्धी महामार्गावर कारने प्रवासाचा आनंद घेतला.
- शेवटचा टप्पा 76 किमी आहे. यामध्ये 5 जुळे बोगदे आहेत. 60 डिग्री तापमान झाल्यास आपोआप पाणी सुरू होते आणि तापमान कमी झाल्यास आपोआप बंद होते. हे सगळे बोगदे एकमेकांना जोडले आहेत. 22 ठिकाणी सुविधा केंद्र असतील.